शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनच्या सवयीपासून कशी कराल सुटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 11:57 IST

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बरच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का?

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करता का? किंवा मग मोबाइल बरच वेळ वाजला नाही त्यामुळे त्याकडे पाहात बसता का? नाहीतर मोबाइलच्या स्क्रिनची लाइट जराशीही लागली तरी तुम्ही हातातली कामं सोडून मोबाइलकडे पाहाता का? मोबाइलची बॅटरी कमी असली किंवा संपत आली तर तुम्ही अस्वस्थ होता का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो असतील तर हे नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे. आता तुम्ही म्हणाल यात काळजी करण्यासारखं काय? मोबाइलची सवय झाली असेल म्हणून असं होत असावं... पण नाही तुमच्या याच सवयी एका आजाराचं कारण ठरू शकतात. 

भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या सवयीचा दर गरजेपेक्षा जास्त वाढत आहे. यामुळेच तरूणाई 'नोमोफोबिया' नावाच्या आजाराने ग्रस्त होत आहे. जवळपास तीन पिढ्या सतत एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर करत आहेत आणि आपला 90 टक्के दिवस उपकरणांसोबतच घालवतात. ही बाब एडोबमधील एका अध्ययनामधून स्पष्ट झाली आहे. 

संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांमधून समोर आल्यानुसार, 50 टक्के वापरकर्ते मोबाइलवर काम सुरू करतात आणि लगेच कंम्युटर स्क्रिनसोमर जाउन बसतात. भारतामध्ये अशाप्रकारे काही वेळातच स्क्रिन स्विच करणं एक साधारण गोष्ट आहे. मोबाइल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणं, डोळे कोरडे होणं, कंप्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचं कारण बनतात. 20 ते 30 वर्षांच्या वयोगटातील जवळपास 60 टक्के तरूणांना आपला मोबाइल फोन विसरण्याची भिती असते. यालाच नोमोफोबिया असं म्हणतात. 

30 टक्के प्रकरणांमध्ये स्मार्टफोन मुलांसाठी संघर्षाचं कारण ठरतात. अनेकद मुलं उशीरा उठतात आणि त्यामुळे कधी कधी शाळेला सुट्टी देखील घेतात. अनेक लोक रात्री झोपायला गेल्यानंतर अंथरूणातच 30 ते 60 मिनिटांचा वेळ मोबाइलवरच काहीतरी करत असतात. 

नोमोफोबिया कसा ओळखावा ?

1. फोनच्या वापरामुळे तुमचा बहुमुल्य वेळ वाया जात असेल. 

2. तुमच्या वागण्या-बोल्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते. इंग्लंडमधील एका सर्वेक्षणानुसार 51 टक्के लोकांना एक्स्ट्रीम टेक अ‍ॅन्झायटी म्हणजे स्मार्टफोनपासून दूर झाल्यास येणारी अस्वस्थता होती.

3. फोनच्या अतिरेकी वापरामुळे तुमची झोप बिघडते, तुम्हाला झोप कमी येते किंवा सतत झोपमोड होते.

स्मार्टफोनची सवय सोडवण्यासाठी काही खस टिप्स : 

  • झोपण्यापुर्वी एक तासभर आधी तरी तुमचा फोन वापरणे बंद करा. व्हायब्रेशन्स, ब्लिंक होणारे लाइटस आणि आवाज तुम्हाला झोप येऊ देत नाही. आता दिवसभराचे काम संपले आहे याची जाणिव मेंदूला होण्यासाठी फोन बंद करणे गरजेचे आहे अन्यथा मेंदूला विश्रांतीची संधीच मिळणार नाही.
  • प्रत्येक तीन महिन्यांमधून 7 दिवसांसाठी फेसबुकचा वापर करू नका.
  • गरज नसेल तर रात्रभर फोन बंद करणे कधीही चांगलेच. फोन बंद केला आणि काहीतरी चांगले-वाईट जगात घडले तर ते आपल्याला समजणार नाही ही भीती नाहक आहे. कोणतीही बातमी पोहचण्यात आता अडथळा येत नाही. प्रत्येक मेसेजला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. किंवा तुमच्या मित्रांच्या फेसबूक किंवा टष्ट्वीटरवर आपण रिअ‍ॅक्ट झालो नाही तर आकाश कोसळेल अशी भीती मनातून काढून टाका. मोबाइल फोन नसताना आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी उदाहरणार्थ फिरायला जाण्यास, खेळायला, व्यायामाला, जेवायला, वाचायला मिळणारा वेळ आठवून पाहा.
  • आठवड्यातून एखादा दिवस सोशल मीडियापासून दूर राहा. 
  • घरातून बाहेर असतानाच मोबाइलचा वापर करा.
  • घरातील काही भागांमध्ये फोन वापरणार नाही असा निश्चय करा. वाचण्याची जागा, स्वयंपाकघर, बाथरुम, टॉयलेट येथे फोन वापरायचा नाही. लहान मुलांपासून फोन दूर ठेवा.
  • नवे छंद किंवा नवी आवड जोपासण्याचा प्रयत्न करा. वाचन, बागकाम, घरकाम तुम्हाला फोनपासून दूर ठेवेल. घरातील लोकांशी, मित्रांशी, शेजाऱ्यांशी स्वत: तेथे जाऊन बोला, तेथे चॅटिंगचा वापर टाळा.
  • एका दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका.
  • तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य जपण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे, मॉडरेशन. याचाच अर्थ तंत्रज्ञानाचा समजुतदारपणाने उपयोग करणं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलInternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडिया