शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

शरीरात पाणी कमी झाल्यावर दिसतात ही गंभीर लक्षणं, दुर्लक्ष कराल तर येऊ शकतो हार्ट अटॅक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 10:45 IST

Side Effects of less water drinking : कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो.

Side Effects of less water drinking : पाणी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती महत्वाचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टरही नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण तरीही काही लोक काही कारणांनी दिवसभर भरपूर पाणी पिऊ शकत नाहीत. अशात त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो.

पाणी कमी पिण्याचा थेट प्रभाव हृदयाच्या आरोग्यावर पडतो. कारण डिहायड्रेशनमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यावर वाईट प्रभाव पडतो. ज्यात हार्ट अटॅक आणि कार्डियोवस्कुलर सिस्टमचा समावेश आहे. अशात आज या लेखात आम्ही तुम्हाला पाणी कमी प्यायल्याने हृदयावर काय परिणाम होतो ते सांगणार आहोत.

अनियमित हार्ट बीट

शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. जेव्हा शरीरात पाणी कमी होतं तेव्हा इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, ज्याचा प्रभाव हृदयाच्या ठोक्यांवर पडतो.

ब्लड फ्लो कमी होतो

पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होऊ शकतं. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. या स्थितीमुळे हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या इतर समस्यांचा धोका वाढतो.

शरीराचं तापमान असंतुलित होतं

पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. पाणी कमी झालं तर शरीराचं तापमान असंतुलित होतं, ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव पडतो. 

किडनी आणि हृदयाचा संबंध

तुम्ही पाणी कमी प्याल तर याचा प्रभाव किडनीवरही पडतो आणि किडनीमध्ये काही समस्या झाली तर याचा नकारात्मक प्रभाव हृदयावर पडतो. कारण दोन्ही अवयवांचं एकमेकांसोबत संबंध असतो.

मेटाबॉलिज्मवर प्रभाव

पाणी कमी प्यायल्यामुळे मेटाबॉल्जिम स्लो होतं. ज्यामुळे शरीरात फॅट आणि टॉक्सिन्स वाढण्याचा धोका असतो. अशात हृदयाच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोकाही अधिक वाढतो.

एका दिवसात किती पाणी प्यावं?

सामान्यपणे रोज किती पाणी प्यावं हे वय, वजन, वातावरण आणि कामावर अवलंबून असतं. एक्सपर्टनुसार, निरोगी शरीरासाठी दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. इतकं पाणी प्यायल्याने किडनीसंबंधी आजारांचा धोका कमी होतो आणि पचनक्रियाही चांगली होते.

रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे

जर तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पित असाल तर ही सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यास खूप फायदेशीर आहे. असं केल्याने पोट सकाळी साफ होतं आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. जेवण केल्यावर पाणी जास्त पिऊ नये, तसेच जेवण करतानाही पाणी पिणं टाळलं पाहिजे. याने अन्न चांगलं पचन होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य