शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

शरीरात पाणी कमी झाल्यावर दिसतात ही गंभीर लक्षणं, दुर्लक्ष कराल तर येऊ शकतो हार्ट अटॅक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 10:45 IST

Side Effects of less water drinking : कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो.

Side Effects of less water drinking : पाणी आपल्या शरीरासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किती महत्वाचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टरही नेहमीच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण तरीही काही लोक काही कारणांनी दिवसभर भरपूर पाणी पिऊ शकत नाहीत. अशात त्यांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. कमी पाणी प्यायल्याने शरीरावर अनेक नकारात्मक प्रभाव पडतात, ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका वाढतो.

पाणी कमी पिण्याचा थेट प्रभाव हृदयाच्या आरोग्यावर पडतो. कारण डिहायड्रेशनमुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यावर वाईट प्रभाव पडतो. ज्यात हार्ट अटॅक आणि कार्डियोवस्कुलर सिस्टमचा समावेश आहे. अशात आज या लेखात आम्ही तुम्हाला पाणी कमी प्यायल्याने हृदयावर काय परिणाम होतो ते सांगणार आहोत.

अनियमित हार्ट बीट

शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. जेव्हा शरीरात पाणी कमी होतं तेव्हा इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात, ज्याचा प्रभाव हृदयाच्या ठोक्यांवर पडतो.

ब्लड फ्लो कमी होतो

पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होऊ शकतं. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. घट्ट रक्त पंप करण्यासाठी हृदयावर जास्त दबाव पडतो. या स्थितीमुळे हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या इतर समस्यांचा धोका वाढतो.

शरीराचं तापमान असंतुलित होतं

पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. पाणी कमी झालं तर शरीराचं तापमान असंतुलित होतं, ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव पडतो. 

किडनी आणि हृदयाचा संबंध

तुम्ही पाणी कमी प्याल तर याचा प्रभाव किडनीवरही पडतो आणि किडनीमध्ये काही समस्या झाली तर याचा नकारात्मक प्रभाव हृदयावर पडतो. कारण दोन्ही अवयवांचं एकमेकांसोबत संबंध असतो.

मेटाबॉलिज्मवर प्रभाव

पाणी कमी प्यायल्यामुळे मेटाबॉल्जिम स्लो होतं. ज्यामुळे शरीरात फॅट आणि टॉक्सिन्स वाढण्याचा धोका असतो. अशात हृदयाच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोकाही अधिक वाढतो.

एका दिवसात किती पाणी प्यावं?

सामान्यपणे रोज किती पाणी प्यावं हे वय, वजन, वातावरण आणि कामावर अवलंबून असतं. एक्सपर्टनुसार, निरोगी शरीरासाठी दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. इतकं पाणी प्यायल्याने किडनीसंबंधी आजारांचा धोका कमी होतो आणि पचनक्रियाही चांगली होते.

रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे

जर तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पित असाल तर ही सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यास खूप फायदेशीर आहे. असं केल्याने पोट सकाळी साफ होतं आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो. जेवण केल्यावर पाणी जास्त पिऊ नये, तसेच जेवण करतानाही पाणी पिणं टाळलं पाहिजे. याने अन्न चांगलं पचन होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य