शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

उन्हाळा आला, अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 18:54 IST

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. भारतामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या काळामधे सुरू होतो. या काळामधे वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे अंगाची लाही लाही होते. घराबाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.

(Image Credit : Erin Ewart Consulting)

डॉ.सारिका आरू (होमिओपेथिक, आहारतज्ज्ञ)

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. भारतामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे या काळामधे सुरू होतो. या काळामधे वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे अंगाची लाही लाही होते. घराबाहेर पडणे मुश्कील होऊन जाते. गुलाबी थंडीनंतर उन्हाळ्याचे प्रखर चटके अगदी नकोसे होतात. हा उन्हाळा येताना काही शारीरिक समस्याही बरोबर घेऊन येतो. जसे की हिट स्ट्रोक, डोकेदुखी, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे (डिहायड्रेशन), सनबर्न, घामोळे व इतर त्वचेच्या तक्रारी, घामामुळे पायांचे इन्फेक्शन इत्यादी. आपण आता बघूया की या शारीरिक तक्रारी झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आपण आधीच काय काळजी घेऊ शकतो?

हिट स्ट्रोक

म्हणजे शरीराचे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले तापमान, जवळ - जवळ 40 अंश सेल्सियस. अतिप्रमाणात शरीराने उष्णता ग्रहण केल्यामुळे हा त्रास होतो. यामुळे मळमळ, उलटी, डोकेदुखी  या तक्रारीसुद्धा सुरू होतात.

काळजी

हिट स्ट्रोक होऊ नये म्हणून बाहेर जाताना सैलसर, हलक्या वजनाची, पातळ आणि फिक्कट रंगाची किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. डोक्याला ऊन लागू नये म्हणून टोपी किंवा स्कार्फ, छत्री यांचा वापर करावा.

शरीराचे तापमान प्रमाणात राहावे यासाठी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी किंवा इतर पातळ पदार्थ यांचे सेवन करत राहावे.

जे लोक बाहेर, उन्हामध्ये काम करतात त्यांनी पाणी पिण्याबरोबरच मधे- मधे सावलीच्या ठिकाणी जाऊन विश्रांती घ्यावी.

सिझनल फळे, फळांचे ज्युस, कोथिंबीर - पुदिना ज्युस, कोरफड ज्युस यांचे सेवन केल्याने हिट स्ट्रोक होत नाही.

हिट स्ट्रोक झाला तर उपाय

ज्या व्यक्तीला हिट स्ट्रोक झाला असेल त्याला तत्काळ थंड ठिकाणी न्यावे, तसेच त्याला हवा घालावी, थंड पाण्याचा शिडकाव करावा किंवा पाण्याच्या टबमधे बसायला सांगावे.

सनबर्न

उन्हाळ्यात जर तुम्ही प्रखर उन्हामधे फिरत किंवा काम करत असाल तर सावध राहा. कारण या प्रखर उन्हामधे अल्ट्राव्हायलेट रेझ असतात. हे रेझ त्वचेवर अतिप्रमाणात पडले तर सनबर्न होऊ शकतो. म्हणजे काय तर त्वचेवर लालसर रंगाचे चट्टे येतात व या चट्ट्यामधे सूज आणि वेदना असतात. याकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्वचेच्या कॅन्सरला सनबर्न कारणीभूत ठरू शकते. ताप, थंडी वाजून येणे, मळमळ, उलटी ही लक्षणे ही आढळून येतात.

उपाय

सनबर्न होऊ नये म्हणून प्रखर उन्हामधे जाण्याच्या १५ ते ३0 मिनिट आधी चेहरा, हात, पाय, पाठ, गळा इ. ठिकाणी सनस्क्रीन लावावी त्यामुळे अल्ट्राव्हायलेट रेझचा दुष्परिणाम टाळता येतो. तसेच गॉगल, टोपी, स्कार्फ, सनकोट, छत्री यांचाही वापर करावा.

डिहायड्रेशन

म्हणजे उष्णतेमुळे शरीरातील पाणी लघवी व घामामार्फत जास्त प्रमाणात शरीराच्या बाहेर टाकले जाते आणि त्या प्रमाणात शरीरामध्ये घेतले जात नाही. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे अतिप्रमाणात तहान लागते, डोके दुखते, उलटी होऊन मोठ्या प्रमाणात थकवा येतो.

उपाय - डिहायड्रेशन होऊ नये म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा, तसेच सिझनल फळे, फळांचा ज्युस, ताक, मठ्ठा, नारळ पाणी घेत राहा.

हिट रॅश (घामोळे)

उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात घाम येतो. अतिप्रमाणात घाम आणि घामाच्या ग्रंथीचे ब्लॉकेज यामुळे हिट रॅश येते. या मधे त्वचेवर पुरळ येतात, वेदना होतात, खाज सुटते. यालाच घामोळे म्हणतात. लहान मुलांमधे याचे प्रमाण जास्त असू शकते कारण त्यांच्या घामाच्या ग्रंथी पूर्णपणे डेव्हलप झालेल्या नसतात.

उपाय- हिट रॅश होऊ नये म्हणून अतिप्रमाणात घाम येणाऱ्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीज टाळाव्यात किंवा अशा फिजिकल अ‍ॅक्टीव्हीटीज सकाळी लवकर किंवा संध्याकाळी कराव्यात. अतिप्रमाणात घाम येत असेल तर दिवसातून 2-3 वेळा अंघोळ करावी. तसेच त्वचा कोरडी राहवी म्हणून टाल्कम पावडर लावावी व सैलसर, सुती कपडे परिधान करावेत.

फूट इन्फेक्शन

उन्हाळ्यामधे पायांना येणाऱ्या अतिप्रमाणात घामामुळे पायाच्या अंगठ्याला किंवा बोटांच्या बेचक्यामधे फूट फंगस, बैक्टीरिया यांची वाढ होते आणि फूट इन्फेक्शन होते. आणि एका बोटांनंतर दुसऱ्याला, असे ते पसरतही जाते.

उपाय

पायाला अतिप्रमाणात घाम येत असेल तर बंद शूज टाळावेत व चपलांचा वापर करावा. परंतु ज्यांना कम्पलसरी शूज वापरावे लागतात त्यांनी रोज स्वच्छ सॉक्स वापरावेत. शूज स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना रोज शूज सॅनिटायझर लावावे. आणि शक्य असल्यास थोड्या थोड्या वेळाने शूज काढून पाय मोकळ्या हवेमधे ठेवावेत.

उन्हाळ्यामध्ये काय खावे, काय खाऊ नये

काय खावे

पातळ पदार्थ आणि पाणी : दिवसभर थोड्या थोड्या वेळाने माठामधील पाणी पीत राहावे. फळांचे ज्युस, नारळ पाणी, ताक, मठ्ठा, पुदिना ज्युस, लिंबूसरबत, सोलकढी इ. चे सेवन करावे.

फळे : द्राक्ष, कलिंगड, संत्री, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, पपई, कवठ, पेरू इ.सर्व सिजनल भाज्या, गाजर, काकडी, टॉमेटो, बीटरुट इ.

प्रत्येक भाजीमधे कांद्याचा भरपूर वापर करावा, कच्चा कांदा किंवा कांद्याचा ज्युस घ्यावा. कांदा थंड असल्याने तो शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो.

जेवण करताना प्रत्येक वेळी दही जिरे टाकून किंवा ताक, कच्चे सलाड यांचा कम्पलसरी समावेश करावा.

काय खाऊ नये

तिप्रमाणात नॉनव्हेज, अति प्रमाणात तिखट, तेलकट पदार्थ, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ टाळावेत. कारण उन्हाळ्यामधे हे पदार्थ पचायला जड जातात आणि त्यामुळे अ‍ॅसिडीटी होते.कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे.

कडक उन्हामधे आईस्क्रीम खाऊ नये. जर खायचे असेल तर ऊन कमी झाल्यावर संध्याकाळी खावे. परंतु शक्यतो टाळावे.

उन्हामधून सावलीमधे आल्या आल्या लगेच थंड पाणी पिऊ नये. थोडा वेळ बसावे आणि नंतर पाणी प्यावे. तसेच उन्हामधून घरी आल्यानंतर लगेच आंघोळ करू नये, शरीराचे तापमान नॉर्मल होऊ द्यावे व नंतर आंघोळ करावी.

फ्रिजमधील पाणी पूर्णपणे टाळावे, कारण ते शरीराला घातक आहे. फ्रिजऐवजी मातीच्या माठामधील पाणी प्यावे, त्यामुळे मातीमधील मिनरल्स ही शरीराला मिळतात. किंवा पाण्याच्या भांड्याला ओले कापड गुंडाळून ठेवावे.

उन्हाळ्यामधील आहार

आपल्या शरीररूपी गाडीला धावपट्टीवर पळवायची असेल तर उत्तम आहाररुपी पेट्रोल टाकावेच लागेल, होय ना! उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. गर्मीमुळे आपण थकून, गळून जातो, उत्साह कमी होतो. त्यासाठी आहार योग्य घेतला तर कामामध्ये चपळाई नक्कीच येईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स