शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

'हा' एक पदार्थ ठरतोय वजन कमी करण्यासाठी रामबाण, संशोधनात दावा; जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:02 IST

स्वीडनमधील चल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. राय हे उत्तर भारतातील थंड प्रदेशात होणारं तृणधान्य आहे.

गहू (Wheat) आणि रायपासून (Rye) बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात, असा आत्तापर्यंत समज होता. परंतु, रायपासून तयार केलेले पदार्थ वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी देखील प्रभावी ठरतात, असा दावा स्वीडनमधील चल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. राय हे उत्तर भारतातील थंड प्रदेशात होणारं तृणधान्य आहे.

दैनंदिन आहारात राययुक्त पदार्थांचा समावेश केल्यास फायदेशीर ठरतं. शरीराचं वजन आणि चरबीवर (Fats) तृणधान्यांचा कशा प्रकारे परिणाम होतो, याचं मूल्यांकन या अभ्यासातून करण्यात आलं. रायवर विशेष लक्ष केंद्रीत करणारा हा पहिला अभ्यास आहे. लठ्ठपणा आणि अतिरिक्त वजन हे जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक आव्हान आहे. यासाठी विविध उपाययोजनांची गरज भासते. भूक लागण्याच्या भावनेवर नियंत्रण आणि चयापचयावर सकारात्मक परिणाम करणारी फूड प्रॉडक्टस (Food Products) विकसित करणं हे उद्दिष्ट असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष क्लिनिकल न्युट्रिशन जर्नलमध्ये (Clinical Nutrition Journal) प्रकाशित झाले आहेत.

या संशोधनात 30 ते 70 वर्षं वयोगटातील 242 किलोग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेल्या पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी व्यक्तींना ठराविक कालावधीकरिता समान कॅलरीज असलेले प्रक्रियायुक्त गहू आणि त्याच प्रमाणात रायपासून तयार केलेले पदार्थ दिले गेले. यादरम्यान सहभागी व्यक्तींमध्ये अनेक बदल दिसून आले.

संशोधकांच्या मते, राय आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ खाणाऱ्या दोन्ही गटांतील व्यक्तींचे वजन कमी झाल्याचे संशोधनादरम्यान दिसून आले. विशेष म्हणजे ज्यांनी राययुक्त पदार्थ खाल्ले त्यांचे वजन गव्हाचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सरासरी एक किलोग्रॅम अधिक कमी झाले. तसेच चरबीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. भिन्न लोकं एकाच अन्नावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतात, हे यातून दिसून आलं.

जाणकार काय म्हणतात?चर्ल्मस युनिव्हर्सिटीतील अन्न आणि पोषण विज्ञान विभागाचे मुख्य संशोधक किआ नोहर इव्हर्सन यांनी सांगितलं की ``संशोधनाचे निष्कर्ष आश्चर्यजनक होते. ज्या सहभागी लोकांनी रायपासून बनवलेले अन्न पदार्थ खाल्ले होते, त्यांचे वजन लक्षणीय कमी झाल्याचं दिसून आलं. यासोबतच त्यांच्या शरीरातील फॅट्सची पातळी तुलनेत कमी झाल्याचं दिसून आलं``.

मात्र, संशोधकांनी याबाबत इशाराही दिला आहे. `असं का होतं? हे जाणून घेण्यासाठी या संशोधनावर अजून काम करणं गरजेचं आहे`, असं संशोधकांनी सांगितलं. आतड्यातील काही बॅक्टेरिया (Bacteria) यास कारणीभूत ठरू शकतात का यावर सध्या आम्ही संशोधन करत आहोत, असं संशोधकांनी स्पष्ट केलं. जे लोक राय अधिक प्रमाणात सेवन करतात, त्यांच्यामध्ये फायबरचं (Fiber) प्रमाण जास्त असतं. जे लोक प्रक्रियायुक्त गव्हापासून (Refined Wheat) तयार केलेले पदार्थ सेवन करतात, त्यांच्या तुलनेत रायपासून तयार केलेले पदार्थ खाणारे व्यक्ती हे अधिक ऊर्जावान असतात, असं मागील अभ्यासात दिसून आलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स