शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

'हा' एक पदार्थ ठरतोय वजन कमी करण्यासाठी रामबाण, संशोधनात दावा; जाणून घ्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 18:02 IST

स्वीडनमधील चल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. राय हे उत्तर भारतातील थंड प्रदेशात होणारं तृणधान्य आहे.

गहू (Wheat) आणि रायपासून (Rye) बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात, असा आत्तापर्यंत समज होता. परंतु, रायपासून तयार केलेले पदार्थ वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी देखील प्रभावी ठरतात, असा दावा स्वीडनमधील चल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला आहे. राय हे उत्तर भारतातील थंड प्रदेशात होणारं तृणधान्य आहे.

दैनंदिन आहारात राययुक्त पदार्थांचा समावेश केल्यास फायदेशीर ठरतं. शरीराचं वजन आणि चरबीवर (Fats) तृणधान्यांचा कशा प्रकारे परिणाम होतो, याचं मूल्यांकन या अभ्यासातून करण्यात आलं. रायवर विशेष लक्ष केंद्रीत करणारा हा पहिला अभ्यास आहे. लठ्ठपणा आणि अतिरिक्त वजन हे जगातील सर्वात मोठे आरोग्यविषयक आव्हान आहे. यासाठी विविध उपाययोजनांची गरज भासते. भूक लागण्याच्या भावनेवर नियंत्रण आणि चयापचयावर सकारात्मक परिणाम करणारी फूड प्रॉडक्टस (Food Products) विकसित करणं हे उद्दिष्ट असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष क्लिनिकल न्युट्रिशन जर्नलमध्ये (Clinical Nutrition Journal) प्रकाशित झाले आहेत.

या संशोधनात 30 ते 70 वर्षं वयोगटातील 242 किलोग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेल्या पुरुष आणि महिलांचा समावेश करण्यात आला होता. सहभागी व्यक्तींना ठराविक कालावधीकरिता समान कॅलरीज असलेले प्रक्रियायुक्त गहू आणि त्याच प्रमाणात रायपासून तयार केलेले पदार्थ दिले गेले. यादरम्यान सहभागी व्यक्तींमध्ये अनेक बदल दिसून आले.

संशोधकांच्या मते, राय आणि गव्हापासून बनवलेले पदार्थ खाणाऱ्या दोन्ही गटांतील व्यक्तींचे वजन कमी झाल्याचे संशोधनादरम्यान दिसून आले. विशेष म्हणजे ज्यांनी राययुक्त पदार्थ खाल्ले त्यांचे वजन गव्हाचे पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सरासरी एक किलोग्रॅम अधिक कमी झाले. तसेच चरबीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. भिन्न लोकं एकाच अन्नावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतात, हे यातून दिसून आलं.

जाणकार काय म्हणतात?चर्ल्मस युनिव्हर्सिटीतील अन्न आणि पोषण विज्ञान विभागाचे मुख्य संशोधक किआ नोहर इव्हर्सन यांनी सांगितलं की ``संशोधनाचे निष्कर्ष आश्चर्यजनक होते. ज्या सहभागी लोकांनी रायपासून बनवलेले अन्न पदार्थ खाल्ले होते, त्यांचे वजन लक्षणीय कमी झाल्याचं दिसून आलं. यासोबतच त्यांच्या शरीरातील फॅट्सची पातळी तुलनेत कमी झाल्याचं दिसून आलं``.

मात्र, संशोधकांनी याबाबत इशाराही दिला आहे. `असं का होतं? हे जाणून घेण्यासाठी या संशोधनावर अजून काम करणं गरजेचं आहे`, असं संशोधकांनी सांगितलं. आतड्यातील काही बॅक्टेरिया (Bacteria) यास कारणीभूत ठरू शकतात का यावर सध्या आम्ही संशोधन करत आहोत, असं संशोधकांनी स्पष्ट केलं. जे लोक राय अधिक प्रमाणात सेवन करतात, त्यांच्यामध्ये फायबरचं (Fiber) प्रमाण जास्त असतं. जे लोक प्रक्रियायुक्त गव्हापासून (Refined Wheat) तयार केलेले पदार्थ सेवन करतात, त्यांच्या तुलनेत रायपासून तयार केलेले पदार्थ खाणारे व्यक्ती हे अधिक ऊर्जावान असतात, असं मागील अभ्यासात दिसून आलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स