शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

तणावामुळे अनेक शारिरीक गंभीर समस्या निर्माण होतात, वेळीच करा हे नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 13:22 IST

शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया.

आजकाल बहुतेक लोक तणावाखाली राहतात. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेतात. आज लोक ज्या प्रकारच्या जीवनशैली जगतात, त्यात तणाव येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनत चालली आहे. काहींना कामाच्या दडपणामुळे तणाव असतो, तर काहींना कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती, नोकरी गमावणे, नोकरी न मिळण्याचा ताण, दैनंदिन जीवनातील समस्या, कोणतीही अप्रिय घटना घडणे, प्रिय व्यक्ती गमावणे इत्यादी समस्या देखील कारणीभूत ठरू शकतात. ताण-ताणतणाव आपल्याला फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही हळूहळू आजारी बनवू शकतो. तणावावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर नैराश्य येऊ शकते. शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया.

तणावामुळे होते काय?StylesAtlife मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, प्रत्येकाचा ताण वेगवेगळा असू शकतो, काहींना कौटुंबिक समस्यांबद्दल, काहींना आरोग्य, ऑफिसच्या कामाचा किंवा मित्रांपासून विभक्त झाल्यामुळे किंवा दूर जाण्याचा तणाव असू शकतो. इतर अनेक कारणांमुळे देखील तणाव निर्माण होतो, ती कारणे खालील प्रमाणे आहेत-

  • नोकरी गेल्यामुळे पदोन्नतीऐवजी पदावनती
  • वैवाहिक जीवनात वाद, भांडणे, घटस्फोट
  • एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे किंवा गंभीर आजारामुळे तणाव
  • जुनाट आजार, शारीरिक इजा
  • भावनिकदृष्ट्या चिंताग्रस्त असणे
  • समवयस्कांचा दबाव, गुंडगिरी
  • नोकरीतून निवृत्ती, एकटेपणा
  • आर्थिक टंचाई
  • तणावाची लक्षणे
  • उत्साह कमी होणे, थकवा येणे
  • डोकेदुखी, निद्रानाश
  • चिडचिड
  • शरीर आणि स्नायू दुखणे
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण
  • तणावामुळे नैराश्य
  • वारंवार सर्दी, इन्फेक्शन
  • उच्च रक्तदाब, हृदयविकार
  • वेगवान हृदयाचे ठोके, छातीत दुखणे
  • वर्तन बदल
  • पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठतेची समस्या
  • छातीत जळजळ
  • वजन वाढणे किंवा कमी होणे
  • मूड स्विंग, चिंता

तणाव दूर करण्याचे नैसर्गिक मार्गजर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुम्ही दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यासाठी तुम्ही फिरायला जा, कोणताही खेळ खेळा. घराबाहेर पडणे आणि ताज्या हवेत फिरायला जाणे यामुळे तणाव कमी होतो. तुम्हाला आतून बरे वाटू शकतं.

योगासने आणि ध्यानधारणा करूनही तणाव कमी करता येतो. मन शांत करण्यासाठी योग आणि ध्यान ही उत्तम तंत्रे आहेत. यामुळे मनाला शांती मिळते. आपल्या नित्यक्रमात १५ ते २० मिनिटे योग आणि ध्यान नक्की करा. त्यामुळे रोज येणार्‍या समस्यांमधील तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच योगासने केल्याने तुम्ही इतर अनेक शारीरिक समस्या देखील टाळू शकता.

दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या. कमी झोप आणि विश्रांतीचा अभाव यामुळेही तणावाची पातळी वाढू शकते. सतत थकवा जाणवल्याने तणावाची मानसिक लक्षणे वाढतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स