शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

अंघोळ करायला कंटाळा येतो? मग ही बातमी तुमच्यासाठीच! अंघोळ न केल्यानं शरीराला होतात 'असे' फायदे

By manali.bagul | Updated: January 20, 2021 12:31 IST

Benefits to not taking a bath : स्किन एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रोज अंघोळ केल्यानं त्वचेला नुकसान होऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसात रोज अंघोळ केल्यानं त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

असे काही लोक आहेत ज्यांना रोज अंघोळ करण्याची सवय असते. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत. ज्यांना हिवाळ्याच्या वातावरणात अंघोळ करायची म्हटलं तर खूप जिवावर येतं. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात अंघोळ करण्याचे फायदे सांगणार आहोत. हिवाळ्यात अंघोळ करायचा तुम्हालाही कंटाळा येत असेल तर आज आम्ही तुम्हाला  काही खास गोष्टी सांगणार आहोत. हेल्थ लाईनने आपल्या वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

स्किन एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रोज अंघोळ केल्यानं त्वचेला नुकसान होऊ शकते. हिवाळ्याच्या दिवसात रोज अंघोळ केल्यानं त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यावेळी त्वचेला गरजेपेक्षा जास्त पोषणाची गरज असते. काही एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात अंघोळ करणं शरीरासाठी काही प्रमाणात हानीकारक ठरू शकतं. 

स्किन स्वतःला स्वच्छ ठेवते

अमेरिकेतील ड्रर्मेटॉलोजिस्ट डॉक्टर रनेला यांनी सांगितले की, ''लोक रोज अस्वच्छ किंवा घाणेरडेपणामुळे नाही तर समाजाच्या  दबावामुळे अंघोळ करतात. अनेक अभ्यासातून असं समोर आलं आहे की,  त्वचेमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची क्षमता असते. जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल, घाम गाळत नसाल तर तुम्ही रोज अंघोळ करणं गरजेचं आहे. ''

रोज अंघोळ केल्यानं त्वचा कोरडी पडते

जर हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही गरम पाण्यानं जास्तवेळ अंघोळ करत असाल तर त्यामुळे नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. तुमची त्वचा कोरडी पडते. कारण त्वचेतील नैसर्गिक तैलयुक्त पदार्थ निघून जातात.  हे नैसर्गिक तेलयुक्त पदार्थ त्वचेला सुरक्षित ठेवतात, म्हणून रोज १० मिनिटांपेक्षा जास्तवेळ अंघोळ करू नका

शरीरासाठी काही बॅक्टेरियाज फायदेशीर असतात

तुमची त्वचा चांगले बॅक्टेरिया तयार करून नेहमी  त्वचेला हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करते. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील साहाय्याक प्राध्यापक डॉक्टर सी बँडन मिशेल यांनी दिलेल्या माहितीनुसार अंघोळ केल्यानंतर त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. यातून अनेकदा चांगले बॅक्टेरियाज निघून जातात. बॅक्टेरियाज इम्यून सिस्टीमला सपोर्ट करण्यासाठी चांगले मानले जातात. त्यासाठी हिवाळ्यात आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा अंघोळ करणं गरजेचं आहे. 

नखांना नुकसान पोहोचतं

दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या नखांचेही नुकसान होते. आंघोळीच्या वेळी, आपली नखं पाणी शोषून घेतात, नंतर मऊ होतात आणि तुटतात. त्यांचे नैसर्गिक तेल देखील बाहेर पडते ज्यामुळे ते कोरडे व कमकुवत होते.

पाणी वाया जाणं

आपण वैयक्तिक मतापेक्षा सगळ्यांचा विचार केल्यास तुम्हाला जाणवेल की,  दररोज आंघोळ केल्यामुळे पाण्याचा अपव्यय देखील होतो. एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या आंघोळीमध्ये दररोज 55 लिटर पाणी वाया जाते. जरी आपण शॉवर घेतला तरी ते पाण्याचा अपव्यय  होतो. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो

विज्ञानानुसार आपण या हंगामात दररोज आंघोळ केली तर प्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. जगभरातील तज्ञांचे मत आहे की हिवाळ्याच्या काळात दररोज आंघोळ करणं फायदेशीर ठरेल. पण एकापेक्षा जास्तवेळा आंघोळ केल्याने आपली त्वचा खराब होते. 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी