शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

क्षय झालेल्या रुग्णांची काळजी तुम्ही कशी घ्याल?, आजाराविषयी समाजात गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 12:05 IST

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने २०३० तर भारताने २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटनाचा निर्धार केला आहे. परिणामी, अजूनही समाजात या आजाराविषयी गैरसमज आहेत. हे दूर सारुन खऱ्या अर्थाने क्षय रुग्णांची काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रुग्णांना तीन हजार रुपयेकेंद्र सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सर्व नोंदणीकृत आणि अधिसूचित क्षय रुग्णांना दरमहा ५०० रुपये देते. हे पाठबळ उपचार कालावधीपर्यंत प्रदान केले जाते. जरी उपचार दोन वर्षांपर्यंत वाढले तरीही दिले जातात.  मुळात रुग्णांना पोषक आहार मिळावा यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. 

उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे उपचारादरम्यान होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होते आणि सरकार रुग्णांची काळजी घेण्यासाठी हे पाठबळ प्रदान करते.

आहाराचे किट ही दिले जातेनिक्षय मित्रांनी क्षय रुग्णांना मोठ्या व्यक्तीकरिता- नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू, तीन किलो, डाळ दीड किलो, तेल २५० ग्रॅम, शेंगदाणा, दूध, पावडर एक किलो तर लहान बालकांना नाचणी, बाजरी, ज्वारी, गहू दोन किलो, डाळ एक किलो, तेल १५० ग्रॅम, शेंगदाणा, दूध पावडर ७५० ग्रॅम याप्रमाणे पोषण आहार किट दरमहा द्यावयाचे आहे. या पोषण आहाराचे उद्दिष्ट रुग्णाचे पोषण योग्य पद्धतीने होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा होय. अशाप्रकारे रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. 

प्रत्येक रुग्ण दत्तक प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियानांतर्गत निक्षय मित्र ही योजना देशभरात कार्यान्वित करण्यात आली आहे. क्षयरोग बाधितांचा पोषक आहार, तपासण्यांचा खर्च, उपचाराकरिता खर्च किंवा गंभीर आजारातून बरे होण्यासाठी पुनर्वसन करण्याकरिता निक्षय मित्र मदत करू शकतात. निक्षय मित्र एक किंवा अनेक क्षय बाधितांना मदत करतो. किमान सहा ते तीन वर्ष क्षय बाधितांना मदत करता येते.

क्षयरोगाचे प्रकार आणि लक्षणे ढोबळमानाने क्षयरोगाचे दोन प्रकार आहेत. फुफ्फुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो   एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस याचा परिणाम फुफ्फुसांसोबतच इतर अवयवांवर ही होतो.

कशी काळजी घ्यावी? क्षयरोगाचे उपचार दीर्घकालीन असतात. या कालावधीत अनेकदा रुग्ण व कुटुंबीय यांना सामाजिक,आर्थिक आणि मानसिक ताणातून जावे लागते. त्यामुळे क्षयरुग्णांचे उपचार पूर्ण करण्यावर अधिक भर देत, समाजातील गैरसमज दूर सारत या कुटुंबीयांचेही पाठबळ वाढविल्यास क्षय रोगावर नियंत्रण मिळविणे आणि प्रतिबंध करणे सोपे जाईल,असे मत श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू देवस्थळी यांनी व्यक्त केले आहे.

  प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियान या योजनेंतर्गत समाजातील विविध घटक म्हणजेच दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सोसायट्या, औद्योगिक तसेच राजकीय संस्था या मदत करू शकतात.   अधिकाधिक क्षय रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालिकेसह अन्य स्तरातून करण्यात येत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य