शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

जगात दरवर्षी होणाऱ्या ९० लाख लोकांच्या अकाली मृत्यूचं कारण पर्यावरण प्रदूषण - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 10:22 IST

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं.

(Image Credit : Wired UK)

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं. असाच एक संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट समोर आला आहे. यानुसार जगभरातील पर्यावरण प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख लोकांचं अकाली निधन होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल एन्वायर्नमेंट आउटलुक सीरिजमध्ये साधारण ६ वर्षांपर्यत रिसर्च केला गेला. ७४० पानांच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगभरात एक चतुर्थांश अकाली होणारे मृत्यू आणि आजार हे प्रदूषण आणि पर्यावरण बिघडल्यामुळे होत आहेत. 

संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट जारी करत इशारा दिला आहे की, जर अजूनही सर्व देशांना एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली नाही तर आशिया, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील शहरं व क्षेत्रात २०५० पर्यंत लाखो लोकांचं अकाली निधन होऊ शकतं. 

दुषित पाण्याने १४ लाख लोकांचा मृत्यू

या रिसर्चमध्ये ७० देशांच्या २५० वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सांगितले की, गरीब आणि श्रीमंतर देशांमध्ये दरी आणखी खोल होत आहे. वस्तूंचा अधिक वापर, प्रदूषण, अन्नाची नासाडी, गरीबांमध्ये आजारही वाढत आहेत. 

रिपोर्टनुसार, या मृत्यूंचं कारण आहे शहरांमध्ये होत असलेलं गॅसचं उत्सर्जन, दुषित पाणी आणि पर्यावरणाची हानी करणे. ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन वाढल्याने वेळेआधीच कुठे दुष्काळ तर कुठे पुराची स्थिती निर्मात होत आहेत. त्यासोबतच समुद्रातील पाण्याची पातळी वाढून वादळ येण्याची शक्यताही अधिक वाढत आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, अन्नाची नासाडी रोखून ग्रीन हाऊस गॅसमध्ये ९ टक्के घट करता येऊ शकते. 

तसेच या शोधातून समोर आले आहे की, स्वच्छ पाण्याच्या अभावामुळे दरवर्षी १४ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. याने डायरिया आणि इतरही इन्फेक्शनचे आजार पसरत आहेत. हे आजार रोखले जाऊ शकतात. समुद्रात वाढत असलेले रसायने आरोग्याला हानी पोहचवत आहेत. घरे बांधण्यासाठी जंगलांची कत्तल वाढत आहे. 

रिपोर्टनुसार, केवळ एअर पॉल्यूशनने दरवर्षी ६० ते ७० लाख लोकांचा मृत्यू होत आहे. खाद्य उत्पादनात वाढलेला अॅंटीबायोटिकचा प्रयोग सुपरबगला ड्रग रेसिस्टेंट करत आहे. जे अकाली होणाऱ्या निधनाचं एक मोठं कारण आहे. 

२०१५ मध्ये पॅरिस जलवायु करारांदरम्यान प्रत्येक देशाने गॅसच्या उत्सर्जनात कमतरता आणण्यासोबतच जगातील तापमान १.५ डिग्री सेंटग्रेड करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यादरम्यान प्रदूषण, जंगलांची कत्तल आणि बदलती खाद्यसंस्कृती याबाबत खोलवर विचार करण्यात आला नाही. 

टॅग्स :Researchसंशोधनunited nationsसंयुक्त राष्ट्र संघHealthआरोग्यair pollutionवायू प्रदूषण