शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जगात दरवर्षी होणाऱ्या ९० लाख लोकांच्या अकाली मृत्यूचं कारण पर्यावरण प्रदूषण - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 10:22 IST

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं.

(Image Credit : Wired UK)

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं. असाच एक संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट समोर आला आहे. यानुसार जगभरातील पर्यावरण प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख लोकांचं अकाली निधन होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल एन्वायर्नमेंट आउटलुक सीरिजमध्ये साधारण ६ वर्षांपर्यत रिसर्च केला गेला. ७४० पानांच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगभरात एक चतुर्थांश अकाली होणारे मृत्यू आणि आजार हे प्रदूषण आणि पर्यावरण बिघडल्यामुळे होत आहेत. 

संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट जारी करत इशारा दिला आहे की, जर अजूनही सर्व देशांना एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली नाही तर आशिया, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील शहरं व क्षेत्रात २०५० पर्यंत लाखो लोकांचं अकाली निधन होऊ शकतं. 

दुषित पाण्याने १४ लाख लोकांचा मृत्यू

या रिसर्चमध्ये ७० देशांच्या २५० वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सांगितले की, गरीब आणि श्रीमंतर देशांमध्ये दरी आणखी खोल होत आहे. वस्तूंचा अधिक वापर, प्रदूषण, अन्नाची नासाडी, गरीबांमध्ये आजारही वाढत आहेत. 

रिपोर्टनुसार, या मृत्यूंचं कारण आहे शहरांमध्ये होत असलेलं गॅसचं उत्सर्जन, दुषित पाणी आणि पर्यावरणाची हानी करणे. ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन वाढल्याने वेळेआधीच कुठे दुष्काळ तर कुठे पुराची स्थिती निर्मात होत आहेत. त्यासोबतच समुद्रातील पाण्याची पातळी वाढून वादळ येण्याची शक्यताही अधिक वाढत आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, अन्नाची नासाडी रोखून ग्रीन हाऊस गॅसमध्ये ९ टक्के घट करता येऊ शकते. 

तसेच या शोधातून समोर आले आहे की, स्वच्छ पाण्याच्या अभावामुळे दरवर्षी १४ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. याने डायरिया आणि इतरही इन्फेक्शनचे आजार पसरत आहेत. हे आजार रोखले जाऊ शकतात. समुद्रात वाढत असलेले रसायने आरोग्याला हानी पोहचवत आहेत. घरे बांधण्यासाठी जंगलांची कत्तल वाढत आहे. 

रिपोर्टनुसार, केवळ एअर पॉल्यूशनने दरवर्षी ६० ते ७० लाख लोकांचा मृत्यू होत आहे. खाद्य उत्पादनात वाढलेला अॅंटीबायोटिकचा प्रयोग सुपरबगला ड्रग रेसिस्टेंट करत आहे. जे अकाली होणाऱ्या निधनाचं एक मोठं कारण आहे. 

२०१५ मध्ये पॅरिस जलवायु करारांदरम्यान प्रत्येक देशाने गॅसच्या उत्सर्जनात कमतरता आणण्यासोबतच जगातील तापमान १.५ डिग्री सेंटग्रेड करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यादरम्यान प्रदूषण, जंगलांची कत्तल आणि बदलती खाद्यसंस्कृती याबाबत खोलवर विचार करण्यात आला नाही. 

टॅग्स :Researchसंशोधनunited nationsसंयुक्त राष्ट्र संघHealthआरोग्यair pollutionवायू प्रदूषण