शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

जगात दरवर्षी होणाऱ्या ९० लाख लोकांच्या अकाली मृत्यूचं कारण पर्यावरण प्रदूषण - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 10:22 IST

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं.

(Image Credit : Wired UK)

जगभरात पर्यावरण प्रदूषण किती आणि कशाप्रकारे किंवा त्यांचा जगण्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो हे सतत समोर येत असतं. असाच एक संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट समोर आला आहे. यानुसार जगभरातील पर्यावरण प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख लोकांचं अकाली निधन होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल एन्वायर्नमेंट आउटलुक सीरिजमध्ये साधारण ६ वर्षांपर्यत रिसर्च केला गेला. ७४० पानांच्या या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगभरात एक चतुर्थांश अकाली होणारे मृत्यू आणि आजार हे प्रदूषण आणि पर्यावरण बिघडल्यामुळे होत आहेत. 

संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट जारी करत इशारा दिला आहे की, जर अजूनही सर्व देशांना एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी कठोर पावले उचलली नाही तर आशिया, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील शहरं व क्षेत्रात २०५० पर्यंत लाखो लोकांचं अकाली निधन होऊ शकतं. 

दुषित पाण्याने १४ लाख लोकांचा मृत्यू

या रिसर्चमध्ये ७० देशांच्या २५० वैज्ञानिकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी सांगितले की, गरीब आणि श्रीमंतर देशांमध्ये दरी आणखी खोल होत आहे. वस्तूंचा अधिक वापर, प्रदूषण, अन्नाची नासाडी, गरीबांमध्ये आजारही वाढत आहेत. 

रिपोर्टनुसार, या मृत्यूंचं कारण आहे शहरांमध्ये होत असलेलं गॅसचं उत्सर्जन, दुषित पाणी आणि पर्यावरणाची हानी करणे. ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन वाढल्याने वेळेआधीच कुठे दुष्काळ तर कुठे पुराची स्थिती निर्मात होत आहेत. त्यासोबतच समुद्रातील पाण्याची पातळी वाढून वादळ येण्याची शक्यताही अधिक वाढत आहे. वैज्ञानिकांचं मत आहे की, अन्नाची नासाडी रोखून ग्रीन हाऊस गॅसमध्ये ९ टक्के घट करता येऊ शकते. 

तसेच या शोधातून समोर आले आहे की, स्वच्छ पाण्याच्या अभावामुळे दरवर्षी १४ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. याने डायरिया आणि इतरही इन्फेक्शनचे आजार पसरत आहेत. हे आजार रोखले जाऊ शकतात. समुद्रात वाढत असलेले रसायने आरोग्याला हानी पोहचवत आहेत. घरे बांधण्यासाठी जंगलांची कत्तल वाढत आहे. 

रिपोर्टनुसार, केवळ एअर पॉल्यूशनने दरवर्षी ६० ते ७० लाख लोकांचा मृत्यू होत आहे. खाद्य उत्पादनात वाढलेला अॅंटीबायोटिकचा प्रयोग सुपरबगला ड्रग रेसिस्टेंट करत आहे. जे अकाली होणाऱ्या निधनाचं एक मोठं कारण आहे. 

२०१५ मध्ये पॅरिस जलवायु करारांदरम्यान प्रत्येक देशाने गॅसच्या उत्सर्जनात कमतरता आणण्यासोबतच जगातील तापमान १.५ डिग्री सेंटग्रेड करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण यादरम्यान प्रदूषण, जंगलांची कत्तल आणि बदलती खाद्यसंस्कृती याबाबत खोलवर विचार करण्यात आला नाही. 

टॅग्स :Researchसंशोधनunited nationsसंयुक्त राष्ट्र संघHealthआरोग्यair pollutionवायू प्रदूषण