शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 13:55 IST

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत.

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचं रक्षण होतं असं म्हटलं जातं. यासोबतच तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. विशेषतः कोमट पाण्याने वजन कमी करण्याचा किंवा पोटाची चरबी कमी करण्याचा दावा खूप प्रसिद्ध आहे. पण या दाव्यात नेमकं कितपत तथ्य आहे ते जाणून घेऊया...

गरम किंवा कोमट पाणी किती फायदेशीर?

गरम पाण्याने चरबी कमी होत नाही परंतु शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. चहा-कॉफी सारख्या कॅलरी पेयांपेक्षा गरम पाण्याची निवड केल्याने तुमचं एकूणच वजन कमी करण्याचं ध्येय असल्यास त्यासाठी मदत होते. यासोबतच संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाली केल्यास अधिक लवकर चांगले परिणाम मिळतील.

डॉक्टर काय म्हणतात?

गुरुग्रामच्या मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या डॉ. वंशिका भारद्वाज यांनी IndiaToday.In ला दिलेल्या माहितीनुसार, गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र यावेळी आपल्या शरीरासाठी योग्य ठरेल इतकंच गरम पाणी प्यावं अन्यथा तोंडाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी प्या. 

गरम पाणी पिण्याचे फायदे 

- गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. - तज्ज्ञांनी सांगितले की गरम पाणी कोरड्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करते.- डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, चांगल्या परिणामांसाठी सकाळी उठल्याबरोबर आणि जेवणापूर्वी गरम पाणी प्या. - पाण्याचे तापमान सुमारे ५० डिग्री सेल्सिअस असावं. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते.- जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटते, ज्यामुळे कॅलरी कमी होऊ शकतात.- तज्ज्ञांच्या मते, गरम पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास, त्वचेची चमक वाढविण्यास, पचनास मदत करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतं.

किती पाणी प्यावं?

डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, जर तुम्हाला हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर दिवसभरात किमान पाच ग्लास गरम पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड आणि संतुलित राहतं. 

टॅग्स :Healthआरोग्य