शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर थेरपीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 12:31 IST

बाजारातील उप्तादनांवर हजारों रुपये खर्च करण्यापेक्षा केवळ पाण्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता.

(Image Credit : behealthy.today)

चेहऱ्याचा नॅच्युरल ग्लो कमी होत असल्याची समस्या अनेकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे बाजारातील महागडी उत्पादने वापरुन चेहऱ्यावर ग्लो आणला जातो. पण बाजारातील उप्तादनांवर हजारों रुपये खर्च करण्यापेक्षा केवळ पाण्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणू शकता. यासाठी तुम्हाला वॉटर थेरपीचा आधार घ्यावा लागेल. त्यासोबतच या थेरपीने अनेक आजारांनाही दूर ठेवता येतं. 

वॉटर थेरपीचे फायदे

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डॉक्टरही नेहमी दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी जर ३ ते ४ ग्लास पाणी प्यायला हवं. रिकाम्या पोटी पाणी पिण्याला वॉटर थेरपी म्हटले जाते. याने आरोग्य तर चांगलं राहिलंच त्यासोबतच याने त्वचेसंबंधीही अनेक फायदे आहेत.

त्वचेवर चमक

त्वचेला चमकदार करण्यासाठी वॉटर थेरपी सर्वात फायदेशीर मानली जाते. पण ही थेरपी नियमीत केल्यासच याचा फायदा दिसेल. अनेकजण काही दिवस ही थेरपी करुन सोडून देतात. पण तसे करुन फायदा होणार नाही. याने अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. 

विषारी पदार्थ बाहेर काढणे

मानवाच्या शरीरात ७० टक्के पाणी असतं. पण तरीही शरीर फिट ठेवण्यासाठी नियमीत योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतं. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने किडनीचं आरोग्यही चांगलं राहतं. यामुळे पोटासंबंधी आजार होत नाहीत. जास्तीत जास्त विषारी पदार्थ शरीरातून बाहेर गेल्यास शुद्ध रक्ताची निर्मिती अधिक होते. 

त्वचा हायड्रेटेड राहते

पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराची एनर्जी वाढते. तसेच चांगल्याप्रकारे हायड्रेटेड शरीर नेहमी आजारांना दूर ठेवतं. त्यामुळे शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यावर भरपूर पाणी पिणे फायद्याचे ठरते. 

खालील आजारांवर वाटर थेरपी प्रभावी

डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, संधीवात, ह्दयाचे जलद ठोके, मिर्गी-अपस्मार, लठ्ठपणा, दमा, टीबी, मेंदुच्या बाहेरील दाह, किडनी, मुत्राशयाचे आजार, उलट्या, जठराची सूज, जुलाब, अपचन, मूळव्याथ, मधूमेह-डायबेटीस, बद्धकोष्ठता, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कॅन्सर, मासिक पाळींचा आजार, कान-नाक आणि घशाचा आजार यावर जलशुद्धीकरण पद्धती प्रभावी ठरली आहे.

अशी सुरू करा 'वाटर थेरपी'

१) सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी कमीत कमी अर्धा लीटर पाणी प्या. मात्र त्याचं प्रमाण एकावेळेस ६०० मिलीपेक्षा जास्त ठेऊ नका. हे प्रमाण पहिल्या दिवसापासून हळूहळू वाढवा, म्हणजे पहिल्या दिवशी एक ग्लास, तिसऱ्या दिवशी दोन ग्लास याप्रमाणे.. पाण्यात फ्लुओराईडचं प्रमाण नको, पाण्यात फ्लुओराईडचं नाही याची खात्री करा, म्हणजेच शुद्ध पाण्याचा वापर करा.

२) पाणी प्यायल्यानंतर ४५ मिनिटांनी ब्रश करा, तोंड धुवा. त्यानंतर मात्र आणखी ४५ मिनिटांचा अवकाश ठेवा.

३) यानंतर ४५ मिनिटांनी तुम्ही नाश्ता करू शकतात.

४) नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यानंतर लगेच पाणी पिऊ नका, प्रत्येक वेळी पाणी २ तासानंतर प्या. 

५) हे दररोज करा, शून्य पैशात तुमची वाटर थेरपी ट्रीटमेंट सुरू झाली आहे असे समजा.

६) जे इतर आजारांवर उपचार घेत असतील, त्यांनी ही थेरपी त्या दरम्यान केल्यास त्यांना फायदा होईल, मात्र त्यांनी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्सWaterपाणी