शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्यायल्यानंतर चूकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; परिणाम ठरतील घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 20:09 IST

पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका.

भरपूर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे अनेकदा सांगितले जाते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आपल्याला  माहित असतील. त्यामुळे तुम्ही हवं तितकं पाणी पिऊ शकता. पण मित्रांनो असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. असे कराल तर ही चूक तुम्हाला भलतीच महागात पडेल.

आईसक्रीम
उन्हाळ्यात आईसक्रीम म्हटल्यावरच तोंडाला पाणी सुटतं. तुमच्याही तोंडाला सुटलंना. पण मित्रहो आईसक्रीम खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका. यामुळे घशात खवखव होऊ शकते. आईसक्रीम खाल्ल्यानंतर १० मिनिटांनी पाणी प्यायलात तर अपाय होण्याचा टळू शकतो.

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर
काही तज्ज्ञ असेही सांगतात की जेवताना पाणी पिऊ नये. त्यामुळे जेवताना पाणी पिणे शक्यतो टाळा. त्यातही तुम्ही गरम जेवण जेवत असाल तर त्यानंतर चूकूनही पाणी पिऊ नका. यामुळे तुमच्या पचनक्रीयेत अडथळा येऊ शकतो. पचनक्रिया झाल्यानंतर ते ते गुणधर्म शरीरातील सर्व भागांपर्यंत पोहचणे जरुरीचे आहे. गरम जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास या प्रक्रियेत समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरम जेवल्यानंतर साधारण ३० मिनीटांनी पाणी प्यावे.

भाजलेले चणे खाल्ल्यानंतर
भाजलेले चणे खाल्ल्यानंतर शरीरात अजिबात पाणी जाता कामा नये. कारण भाजलेले चणे पचवण्याकरीता जठराग्नी तीव्र होण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे हा जठराग्नी शांत होतो आणि चणे नीट पचत नाहीत. त्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

शेंगदाणे खाल्ल्यावर 
शेंगदाणे खाल्ल्यानंतर भरपूर तहान लागते. पाणी पिण्याची सतत इच्छ होते. पण जरा ताबा ठेवा कारण, शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यामुळे खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळानंतर पाणी पिणे योग्य.

कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर
कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नका. कलिंगड व टरबुजात मोठ्याप्रमाणावर पाणी असते. त्यामुळे आपली तहान नुसतं कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानेच शांत होते. अशात तुम्ही आणखी पाणी प्यायलात तर पित्त, पोट फुगलेलं वाटणे व पोटाचे इतर विकार होऊ शकतात.

काकडी
काकडीमध्येही ९५ टक्के पाणी असते त्यामुळे काकडी खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास जुलाब होण्याची शक्यता असते. काकडीमध्ये पोषणतत्वे मोठ्याप्रमाणावर असतात त्यामुळे शरीराला त्याचा फायदाच होतो. परंतू ज्यावेळी तुम्ही काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिता तेव्हा शरीरातील जीयाईची गती वाढते आणि हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नWaterपाणी