शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना लसीची गरज भासणार नाही? तज्ज्ञांनी सांगितले की.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 12:08 IST

CoronaVirus News & latest Updates : कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला कोरोना लसीची आवश्यकता असेल  का असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

कोरोना व्हायरसची लस चाचणीदरम्यान यशस्वी ठरली असून आता अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली आहे. लसीबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर या आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला कोरोना लसीची आवश्यकता असेल  का असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर तज्ज्ञ काय म्हणाले याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अमेरिकेतील लसीकरण कार्यक्रम सल्लागार समिती (ACIP) नुसार ज्या लोकांना सगळ्यात आधी कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यांनीसुद्धा लस घ्यायला हवी. सीडीसीने दिलेल्या एका अहवालानुसार वैद्यकिय चाचणीतून दिसून येतं की, ज्या लोकांना आधी व्हायरसचं संक्रमण झालं होतं. त्यांच्यासाठीही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. 

आधी कोरोना संक्रमण झाल्यामुळे  रुग्णांच्या शरीरात कोरोनाच्या एंटीबॉडी तयार झालेल्या असतात. त्यामुळे लसीची गरज का आहे. असा प्रश्न उपस्थित होतो. Imanis Life Sciences चे  सीईओ स्टीफन रसेल यांनी हेल्थ वेबसाईटशी बोलताना सांगितले की, संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या स्तरावर एंटीबॉडी तयार होतात. न्यूट्रलाईजिंग एंटीबॉडीजचा उच्च स्तर नवीन इंफेक्शनविरुद्ध लढण्यासाठी सुरक्षा प्रदान करतो.

डॉक्टर रसेल यांनी सांगितले की,  जर कोणत्या व्यक्तीच्या शरीरात कोविड १९ विरूद्ध लढण्यासाठी योग्य प्रमाणात एंटीबॉडीज तयार झाल्या नसतील तर पुन्हा कोरोना संक्रमण झाल्यानंतर  धोका वाढू शकतो.  कोरोना व्हायरसच्या गंभीर संक्रमणाचा सामना करावा लागलेल्या लोकांच्या बाबतीतही असं होऊ शकतं. फ्रंटियर इन इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना रुग्णाचे संक्रमण इतके वाढले होते.  त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीने काम करणं बंद केलं होतं. कारण व्हायरसशी लढण्यासाठी योग्य प्रमाणात एंटीबॉडीज तयार झाल्या नव्हत्या.

पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

लसीच्या सुरक्षेबद्दल बोलताना डॉक्टर रसेल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांना संक्रमण होऊन गेल्यानंतर ६ महिन्यांनी  बुस्टर डोज लस दिली जायला हवी. यावर आम्ही अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी सांगितले की,  न्युट्रिलायजिंग एंटीबॉडीजने मिळणारी सुरक्षा आणि इम्यूनिटी एकत्र कमी होऊ लागते. 

चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

डॉक्टर रसेल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संक्रमणातून बरं झाल्यानंतर एंटीबॉडीज हळूहळू कमी होऊ लागतात. यातून असं दिसून येतं की लस घेणं लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. कोरोना व्हायरसच्या लसीचे कसे परिणाम दिसून आले आहेत. याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लस घेतल्यानंतर लोकांना कोरोनापासून दीर्घकाळ सुरक्षा मिळू शकते.   

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला