शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! मोतीबिंदुच्या ऑप्रेशनमुळे स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता कमीच, संशोधनच सांगते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:55 IST

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्याने स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा या संशोधनाच्या आधारे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) संशोधकांनी केला आहे.

साधारण पन्नाशीनंतर डोळ्यांत (Eyes) मोतीबिंदू (Cataracts) होण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी तो काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (Cataracts Surgery) केली जाते. दर वर्षी लाखो नागरिक ही शस्त्रक्रिया करून घेतात. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अगदी सहज सोपी झाली असून, काही तासांत रुग्ण घरी जाऊ शकतो.

डोळ्यांशी संबंधित या साध्याशा शस्त्रक्रियेचा संबंध मानवी स्मरणशक्तीशी (Memory) आहे असा शोध अलीकडेच अमेरिकेत (USA) झालेल्या एका संशोधनातून पुढे आला आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्याने स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा या संशोधनाच्या आधारे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या (Washington University) संशोधकांनी केला आहे. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

जामा इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा स्मरणशक्तीवर काय परिणाम होतो, याचं उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आहे. मोतीबिंदू आणि स्मृतिभ्रंश यांच्यातला संबंध समजून घेण्यासाठी या संशोधकांनी 3 हजार नागरिकांवर संशोधन केलं. यामध्ये सुमारे 65 वर्षं वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. यात सहभागी असलेल्या सुमारे 50 टक्के व्यक्तींनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर 8 वर्षं त्यांचं निरीक्षण करण्यात आलं. त्यात असं आढळलं, की डोळ्यांतला मोतीबिंदू काढून टाकल्यानंतर रुग्णांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका 29 टक्क्यांनी कमी झाला.

डोळ्यांतला मोतिबिंदूचा भाग काढून टाकल्यानंतर निळा प्रकाश (Blue Light) रुग्णापर्यंत अधिक पोहोचू लागतो. निळा प्रकाश रेटिनाच्या (Retina) पेशींना पुन्हा सक्रिय करतो, ज्याचा संबंध माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेशी असतो. झोप चांगली लागते. परिणामी, मानवी मेंदू (Brain) अधिक चांगलं कार्य करतो, असं या संशोधनात नमूद करण्यात आलं आहे. संशोधक डॉ. सेसिलिया ली यांच्या मते, या संशोधनादरम्यान मिळालेले पुरावे आश्चर्यकारक आहेत.

कारण याआधी शरीराच्या दोन्ही भागांचा असा संबंध समजला नव्हता. या संशोधनाचे परिणामदेखील महत्त्वाचे आहेत. कारण जगातल्या बहुतेक देशांमध्ये मोतिबिंदूचे रुग्ण वाढत आहेत. एकट्या इंग्लंडमध्ये दर वर्षी मोतीबिंदूच्या 3 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याच वेळी, अमेरिकेत हा आकडा 20 लाख आहे. आजकाल बहुसंख्य वृद्धांमध्ये स्मरणशक्ती कमी होणं, निर्णय घेण्याची, विचार करण्याची क्षमता कमी होणं, बोलण्यात अस्पष्टता येणं अशी लक्षणं दिसतात. त्या पार्श्वभूमीवर हे संशोधन महत्त्वाचं आहे.

मोतीबिंदू हा वृद्धापकाळात होणारा डोळ्यांचा आजार आहे. वयाच्या पन्नाशीनंतर शरीरात अँटिऑक्सिडंट्सची (Antioxidents) कमतरता निर्माण होते आणि डोळ्यांमध्ये कॅल्शियम (Calcium) जमा होऊ लागते. त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या नैसर्गिक लेन्सवर (Natural Lens) होतो. ही लेन्स खराब होऊ लागते. डोळ्यांच्या बाहुलीवर पांढरे डाग दिसू लागतात.

परिणामी, रुग्णाला सर्व काही अस्पष्ट दिसू लागतं. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांमध्ये स्थिती अधिक बिकट असते. शस्त्रक्रिया करून हा मोतीबिंदू हटवला जातो, जेणेकरून रुग्णाला स्वच्छ दिसू लागतं. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा स्मरणशक्तीशी असणारा संबंध आश्चर्यकारक असून, या संशोधनामुळे स्मृतिभ्रंश आणि त्यावरच्या उपचारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स