शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

Blood : कुठेच रक्त मिळत नाहीये ? - आता चिंता सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:48 IST

Blood: विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक दुर्धर आजारांवर पूर्वी मृत्यू हाच एक पर्याय होता; पण आता अनेक असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले आहेत आणि असे लोकही सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक दुर्धर आजारांवर पूर्वी मृत्यू हाच एक पर्याय होता; पण आता अनेक असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले आहेत आणि असे लोकही सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. तरीही आजही अनेक लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी मृत्यूची वाट पाहत जगत राहणं आणि एक दिवस या जगातून निघून जाणं, एवढाच पर्याय शिल्लक आहे. आरोग्य विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना आणि जवळपास प्रत्येक आजारावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध असताना असं का व्हावं? - याचं कारण आहे रक्ताची कमतरता. अनेक आजारांतील रुग्णांना उपचार तर उपलब्ध आहेत; पण त्यांना गरजेच्या वेळी रक्तच मिळत नाही, ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. यासंदर्भातील जागतिक आकडेवारी बघितली तरी रक्तदानासंदर्भात आपण किती उदासीन आहोत, हे लक्षात येतं. त्यातल्या त्यात श्रीमंत देशांमध्ये तरी परिस्थिती बरी आहे; पण गरीब आणि विकसनशील देशांमध्ये याबाबत काही जाणीव जागृतीच नाही, अशी परिस्थिती आहे. श्रीमंत आणि उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रक्तदानाचं प्रमाण आहे दरहजारी ३१.५, उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण आहे १६.४, कमी मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये ६.६ तर गरीब, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रक्तदानाचं प्रमाण आहे दरहजारी फक्त पाच ! जगातल्या कुठल्याही देशात जा, तिथे रक्ताची टंचाईच आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो तो वेळेवर आणि हव्या त्या गटाचे रक्त न मिळाल्यामुळेच. यासाठीच कृत्रिम रक्त तयार करण्याचे प्रयत्न संशोधक कित्येक वर्षांपासून करताहेत; पण त्यांना अजून तरी त्यात म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. नैसर्गिक रक्ताला कोणताही पर्याय सापडत नसताना चिंतेत पडलेल्या संशोधकांना आता आशेचा एक नवा किरण गवसला आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेलं रक्त पहिल्यांदाच स्वयंसेवकांना चढवण्यात आल्याचं आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. केम्ब्रीज आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांच्या नामांकित संशोधकांनी या संशोधनात आपला सहभाग दिला. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर मानवजातीला अक्षरश: वरदान मिळेल. आरोग्य विज्ञानामुळे आधीच मानवाच्या आयुष्यात बरीच वाढ झाली आहे, हा प्रयोग सफल झाल्यास मानवाला सुदृढ आयुष्याचीही देणगी मिळेल. एवढंच नाही, ज्यांचा रक्तगटच अतिशय दुर्मीळ आहे, त्यांना वाचवण्यासाठी तर हा मार्ग सर्वोत्तम आणि जणूकाही शेवटचा असेल. कारण आपल्याला माहीत आहेत ते फक्त ठराविक रक्तगट. उदाहरणार्थ ए, बी, एबी, ओ.. आदी. मात्र त्या व्यतिरिक्तही असे अनेक रक्तगट आहेत, जे सर्वसामान्यांना माहीतच नाहीत. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे प्रो. ॲशले म्हणतात, काही रक्तगट तर इतके दुर्मीळ आहेत की, त्या रक्तगटाचे संपूर्ण जगभरात एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक आहेत. अशा लोकांना काही झालं तर काय करायचं? त्यांच्यासाठी तर ‘वाट पाहण्याचाही’ पर्याय उपलब्ध नाही. उदाहरणार्थ एका रक्तगटाचं नाव आहे, ‘बॉम्बे’! या रक्तगटाचा व्यक्ती सर्वप्रथम भारतातच सापडला होता. संपूर्ण ब्रिटनमध्ये या रक्तगटाचे केवळ तीन युनिट्स उपलब्ध आहेत! अर्थात आत्ता प्रयोगशाळेत जे रक्त तयार करण्यात आलं आहे, ते अजून संपूर्णपणे रुग्णाला देता येऊ शकत नाही. कारण त्यावरच्या काही चाचण्या बाकी आहेत. मात्र, नैसर्गिक रक्तात हे कृत्रिम रक्त थोड्या प्रमाणात मिसळून त्याचे काही दुष्परिणाम होतात का, हे सध्या तपासलं जात आहे. हे रक्त मिसळण्याचं प्रमाण सध्या तरी एक-दोन चमचे एवढंच मर्यादित आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या रक्तात लाल रक्तकोशिकांवर भर देण्यात आला आहे. या कोशिका फुप्फुसातून ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीरभर तो पसरवतात. या पद्धतीत सर्वसामान्य व्यक्तीचं रक्त घेऊन त्यात कृत्रिम रक्त मिसळून ते इतर रुग्णांना दिलं जाऊ शकतं. या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे पाच लाख स्टेम सेल्समधून तब्बल ५० कोटी लाल रक्तपेशी तयार होऊ शकतात.

कृत्रिम रक्त अधिक दमदार ! संशोधकांचं म्हणणं आहे, सामान्यपणे लाल रक्तपेशी जास्तीत जास्त १२० दिवसांपर्यंत टिकतात. त्यानंतर त्यांची जागा नव्या पेशी घेतात. जेव्हा कोणाचंही रक्त रुग्णाला दिलं जातं, तेव्हा त्यात नव्या आणि जुन्या रक्तपेशींचं मिश्रण असतं. कृत्रिम रक्तातील पेशी मात्र संपूर्णत: नव्या असल्यानं त्या पूर्ण १२० दिवस टिकतील, त्यामुळे रुग्णांना जास्त रक्ताची गरज पडणार नाही; पण यामुळे रक्तदानाचं प्रमाण आणखी कमी होईल, अशीही साधार भीती संशोधकांना वाटते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीHealthआरोग्य