शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Blood : कुठेच रक्त मिळत नाहीये ? - आता चिंता सोडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 11:48 IST

Blood: विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक दुर्धर आजारांवर पूर्वी मृत्यू हाच एक पर्याय होता; पण आता अनेक असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले आहेत आणि असे लोकही सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत.

विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक दुर्धर आजारांवर पूर्वी मृत्यू हाच एक पर्याय होता; पण आता अनेक असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले आहेत आणि असे लोकही सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. तरीही आजही अनेक लोक असे आहेत, ज्यांच्यासाठी मृत्यूची वाट पाहत जगत राहणं आणि एक दिवस या जगातून निघून जाणं, एवढाच पर्याय शिल्लक आहे. आरोग्य विज्ञानाची एवढी प्रगती झालेली असताना आणि जवळपास प्रत्येक आजारावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध असताना असं का व्हावं? - याचं कारण आहे रक्ताची कमतरता. अनेक आजारांतील रुग्णांना उपचार तर उपलब्ध आहेत; पण त्यांना गरजेच्या वेळी रक्तच मिळत नाही, ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. यासंदर्भातील जागतिक आकडेवारी बघितली तरी रक्तदानासंदर्भात आपण किती उदासीन आहोत, हे लक्षात येतं. त्यातल्या त्यात श्रीमंत देशांमध्ये तरी परिस्थिती बरी आहे; पण गरीब आणि विकसनशील देशांमध्ये याबाबत काही जाणीव जागृतीच नाही, अशी परिस्थिती आहे. श्रीमंत आणि उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रक्तदानाचं प्रमाण आहे दरहजारी ३१.५, उच्च मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे प्रमाण आहे १६.४, कमी मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये ६.६ तर गरीब, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये रक्तदानाचं प्रमाण आहे दरहजारी फक्त पाच ! जगातल्या कुठल्याही देशात जा, तिथे रक्ताची टंचाईच आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो तो वेळेवर आणि हव्या त्या गटाचे रक्त न मिळाल्यामुळेच. यासाठीच कृत्रिम रक्त तयार करण्याचे प्रयत्न संशोधक कित्येक वर्षांपासून करताहेत; पण त्यांना अजून तरी त्यात म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. नैसर्गिक रक्ताला कोणताही पर्याय सापडत नसताना चिंतेत पडलेल्या संशोधकांना आता आशेचा एक नवा किरण गवसला आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेलं रक्त पहिल्यांदाच स्वयंसेवकांना चढवण्यात आल्याचं आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. केम्ब्रीज आणि ब्रिस्टल युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांच्या नामांकित संशोधकांनी या संशोधनात आपला सहभाग दिला. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, हा प्रयोग जर यशस्वी झाला, तर मानवजातीला अक्षरश: वरदान मिळेल. आरोग्य विज्ञानामुळे आधीच मानवाच्या आयुष्यात बरीच वाढ झाली आहे, हा प्रयोग सफल झाल्यास मानवाला सुदृढ आयुष्याचीही देणगी मिळेल. एवढंच नाही, ज्यांचा रक्तगटच अतिशय दुर्मीळ आहे, त्यांना वाचवण्यासाठी तर हा मार्ग सर्वोत्तम आणि जणूकाही शेवटचा असेल. कारण आपल्याला माहीत आहेत ते फक्त ठराविक रक्तगट. उदाहरणार्थ ए, बी, एबी, ओ.. आदी. मात्र त्या व्यतिरिक्तही असे अनेक रक्तगट आहेत, जे सर्वसामान्यांना माहीतच नाहीत. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे प्रो. ॲशले म्हणतात, काही रक्तगट तर इतके दुर्मीळ आहेत की, त्या रक्तगटाचे संपूर्ण जगभरात एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक आहेत. अशा लोकांना काही झालं तर काय करायचं? त्यांच्यासाठी तर ‘वाट पाहण्याचाही’ पर्याय उपलब्ध नाही. उदाहरणार्थ एका रक्तगटाचं नाव आहे, ‘बॉम्बे’! या रक्तगटाचा व्यक्ती सर्वप्रथम भारतातच सापडला होता. संपूर्ण ब्रिटनमध्ये या रक्तगटाचे केवळ तीन युनिट्स उपलब्ध आहेत! अर्थात आत्ता प्रयोगशाळेत जे रक्त तयार करण्यात आलं आहे, ते अजून संपूर्णपणे रुग्णाला देता येऊ शकत नाही. कारण त्यावरच्या काही चाचण्या बाकी आहेत. मात्र, नैसर्गिक रक्तात हे कृत्रिम रक्त थोड्या प्रमाणात मिसळून त्याचे काही दुष्परिणाम होतात का, हे सध्या तपासलं जात आहे. हे रक्त मिसळण्याचं प्रमाण सध्या तरी एक-दोन चमचे एवढंच मर्यादित आहे. प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या रक्तात लाल रक्तकोशिकांवर भर देण्यात आला आहे. या कोशिका फुप्फुसातून ऑक्सिजन घेऊन संपूर्ण शरीरभर तो पसरवतात. या पद्धतीत सर्वसामान्य व्यक्तीचं रक्त घेऊन त्यात कृत्रिम रक्त मिसळून ते इतर रुग्णांना दिलं जाऊ शकतं. या पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे पाच लाख स्टेम सेल्समधून तब्बल ५० कोटी लाल रक्तपेशी तयार होऊ शकतात.

कृत्रिम रक्त अधिक दमदार ! संशोधकांचं म्हणणं आहे, सामान्यपणे लाल रक्तपेशी जास्तीत जास्त १२० दिवसांपर्यंत टिकतात. त्यानंतर त्यांची जागा नव्या पेशी घेतात. जेव्हा कोणाचंही रक्त रुग्णाला दिलं जातं, तेव्हा त्यात नव्या आणि जुन्या रक्तपेशींचं मिश्रण असतं. कृत्रिम रक्तातील पेशी मात्र संपूर्णत: नव्या असल्यानं त्या पूर्ण १२० दिवस टिकतील, त्यामुळे रुग्णांना जास्त रक्ताची गरज पडणार नाही; पण यामुळे रक्तदानाचं प्रमाण आणखी कमी होईल, अशीही साधार भीती संशोधकांना वाटते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीHealthआरोग्य