शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
3
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
4
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
5
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
6
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
7
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
8
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
9
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
10
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
11
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
12
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
13
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
14
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
15
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
16
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
17
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
18
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
19
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

Benefits of belpatra: ब्लड प्रेशर अन् डायबिटीसला नियंत्रणात ठेवणार बेलाचं पान; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:10 IST

Benefits of belpatra : बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो.

आजकाल प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या समस्यांसाठी गोळ्या असतात. तर कोणी घरगुती, आयुर्वेदिक उपाय करताना दिसून येतं. घरगुती उपायांसाठी तुम्हाला फारसे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. तसंच जास्तीचा खर्चसुद्धा होत नाही. आज आम्ही तुम्हाला पूजेच्या सामानात हमखास उपलब्ध असणाऱ्या बेलपत्राचे फायदे सांगणार आहोत. शंकराच्या पुजेसाठी बेलाचा वापर सर्वत्र केला जातो. बेल शंकराला प्रिय असल्यानं सोमवारी किंवा महाशिवरात्र अशा सण उत्सवांच्या दिवशी बाजारात बेलच बेल पाहायला मिळतात. 

वेबएमडी(WEBMD) च्या रिपोर्टनुसार  बेलाचं शास्त्रीय नाव एजेल मार्मलोस (Aegle Marmelos) आहे. बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रायबोफ्लोबीन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6, बी 12 यात मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार, मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. यापैकी कोणत्याही एका दोषाचं शरीरातलं प्रमाण असंतुलित झालं की काही विकार निर्माण होतात. या दोषांचे नियंत्रण करण्यासाठी बेलपान गुणकारी ठरते. 

फायदे

डायबिटीस , ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल (Cholesterol) आणि हृदयाशी संबधित आजार दूर करण्यात बेलपान अत्यंत फायदेशीर ठरते.  ज्या लोकांना अपचन, पोट साफ न होण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी बेल गुणकारी आहे. पोट साफ करण्यासाठी बेल अत्यंत गुणकारी आहे. यामधील लक्सेटीव्ह गुणधर्म असल्यामुळे पचन संस्था अत्यंत व्यवस्थित राहते.

सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंटस असतात. याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तुकतुकीत होते. चेहऱ्यावर डाग असतील, घामामुळे दुर्गंध येत असेल तर बेलपानाचा फेसपॅक या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो. बेलपानाचा ज्यूस प्यायल्यास किंवा याची पाने खाल्ल्यास केस गळण्याची समस्याही दूर होते याशिवाय केस चमकदा आणि दाट होतात.

अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित

खासकरून उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सरबत प्यायल्यास शरीराचे तापमान अगदी नियंत्रित राहतं. बेलफळातील गर काढून त्यात दोन ग्लास पाणी घालावे, एक लिंबू, चार-पाच पुदिन्याची पानं आणि चवीनुसार साखर घालून सरबत बनवा. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास उष्णतेनं होणाऱ्या आजारांपासून सुटका होईल. सध्या महाशिवरात्र येत असल्यामुळे बाजारात तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेल उपलब्ध होतील.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सspiritualअध्यात्मिक