शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Benefits of belpatra: ब्लड प्रेशर अन् डायबिटीसला नियंत्रणात ठेवणार बेलाचं पान; इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:10 IST

Benefits of belpatra : बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो.

आजकाल प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या समस्यांसाठी गोळ्या असतात. तर कोणी घरगुती, आयुर्वेदिक उपाय करताना दिसून येतं. घरगुती उपायांसाठी तुम्हाला फारसे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. तसंच जास्तीचा खर्चसुद्धा होत नाही. आज आम्ही तुम्हाला पूजेच्या सामानात हमखास उपलब्ध असणाऱ्या बेलपत्राचे फायदे सांगणार आहोत. शंकराच्या पुजेसाठी बेलाचा वापर सर्वत्र केला जातो. बेल शंकराला प्रिय असल्यानं सोमवारी किंवा महाशिवरात्र अशा सण उत्सवांच्या दिवशी बाजारात बेलच बेल पाहायला मिळतात. 

वेबएमडी(WEBMD) च्या रिपोर्टनुसार  बेलाचं शास्त्रीय नाव एजेल मार्मलोस (Aegle Marmelos) आहे. बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रायबोफ्लोबीन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6, बी 12 यात मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार, मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. यापैकी कोणत्याही एका दोषाचं शरीरातलं प्रमाण असंतुलित झालं की काही विकार निर्माण होतात. या दोषांचे नियंत्रण करण्यासाठी बेलपान गुणकारी ठरते. 

फायदे

डायबिटीस , ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल (Cholesterol) आणि हृदयाशी संबधित आजार दूर करण्यात बेलपान अत्यंत फायदेशीर ठरते.  ज्या लोकांना अपचन, पोट साफ न होण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी बेल गुणकारी आहे. पोट साफ करण्यासाठी बेल अत्यंत गुणकारी आहे. यामधील लक्सेटीव्ह गुणधर्म असल्यामुळे पचन संस्था अत्यंत व्यवस्थित राहते.

सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंटस असतात. याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तुकतुकीत होते. चेहऱ्यावर डाग असतील, घामामुळे दुर्गंध येत असेल तर बेलपानाचा फेसपॅक या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो. बेलपानाचा ज्यूस प्यायल्यास किंवा याची पाने खाल्ल्यास केस गळण्याची समस्याही दूर होते याशिवाय केस चमकदा आणि दाट होतात.

अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित

खासकरून उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सरबत प्यायल्यास शरीराचे तापमान अगदी नियंत्रित राहतं. बेलफळातील गर काढून त्यात दोन ग्लास पाणी घालावे, एक लिंबू, चार-पाच पुदिन्याची पानं आणि चवीनुसार साखर घालून सरबत बनवा. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास उष्णतेनं होणाऱ्या आजारांपासून सुटका होईल. सध्या महाशिवरात्र येत असल्यामुळे बाजारात तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेल उपलब्ध होतील.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सspiritualअध्यात्मिक