शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता मिळताच त्यांना पडला शेतकऱ्यांचा विसर

By admin | Updated: October 27, 2015 02:07 IST

शेतकऱ्यांच्या समस्यांवर ढोंग करणारे आज सत्तेत आले. निवडणुकीच्या वेळी धानाच्या भावात वृद्धी, बेरोजगारीची

 गोंदिया : शेतकऱ्यांच्या समस्यांवर ढोंग करणारे आज सत्तेत आले. निवडणुकीच्या वेळी धानाच्या भावात वृद्धी, बेरोजगारीची समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आता १८ महिन्यांच्या काळात त्या आश्वासनांचे काय झाले हे जनतेने त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. सत्ता मिळताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचा टोला खासदार प्रफल पटेल यांनी लगावला. अर्जुनी येथील नगर पंचायत निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला आमदार राजेंद जैन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रीकापुरे, नामदेव डोंगरवार, हेमंत भांडारकर, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, चित्रलेखा मिश्रा, सुधीर वासवानी, उद्धव मेहंदळे, रतिराम राणे, जे.टी.काळसर्पे, विनोद चांदेवार, सोमदास गणवीर, पुरूषोत्तम घाटबांधे, श्रीदान पालीवाल, शीला उके, राकेश जायस्वाल, हलमारे, गोवर्धन ताराम, घुसाजी मेश्राम, भाऊदास खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, स्वत:ला लोकनेता व भूमीपूत्र म्हणवून जनतेला खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखविण्यात आले. आम्हाला येथील नागरिकांच्या समस्यांची पूर्ण जाणीव असून त्याचप्रकारे आम्ही निरंतर विकासासाठी कार्य करीत आहोत. आमच्या सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना धानावर बोनस, बीआरजीएफ, घरकुल यासरख्या अनेक जनकल्याणकारी योजना यांनी बंद केल्यात. अशाप्रकारेच हे सत्ताधारी अच्छे दिन आणणार काय असा सवालही त्यांनी केला. खासदार पटेल म्हणाले, तुम्ही गावातील जनप्रतिनिधींना विकास कामांचे काय झाले, कल्याणकारी योजना बंद काऊन झाल्या याबाबत विचारायला हवे. लालदिव्याच्या गाडीत बसून माणूस मोठा होत नसून काम केल्याने मोठा होतो. आज सामान्य माणसाला धान्य, केरोसीन मिळत नाही, डाळ २०० रूपये किलो पोहोचली, महागाई आपल्या चरमसिमेवर आली असून अशाप्रकारेच ते अच्छे दिनचा वादा निभावत आहेत. मोदीची आपल्या मनातली गोष्ट बोलून देतात व जनता त्यांचे म्हणणे ऐकते. मात्र जनतेच्या मनातील गोष्ट या सरकारमध्ये ऐकणारा कुणीच नाही. पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, आमच्या शासनकाळात आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती दिली. ती सर्व कामे आता ठप्प पडून आहेत. कारण जनतेच्या समस्यांशी भाजप जनप्रतिनिधींना काहीच घेणे-देणे नाही. करिता अर्जुनीच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)