शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुलांवरून बंदी उठविल्याने प्रक्रिया उद्योगाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

अर्जुनी माेरगाव : राज्य शासनाने मोहफुुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले ...

अर्जुनी माेरगाव : राज्य शासनाने मोहफुुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले आहे. यामुळे बाजारपेठ खुली झाली. मोहफुलाला अपेक्षित दर मिळेल व परप्रांतातून चोरीने मोहफूल येणार नाही. यामुळे स्थानिक मोहफूल संकलित करणाऱ्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळेल. त्यामुळे मोहफूल उपलब्ध असणाऱ्या परिसरात मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील जंगलात व शेताच्या बांधावर अनेक मोहफुलांची झाडे दिसतात. जिल्ह्यातील सालेकसा, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, देवरी या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची झाडे आहेत. यापूर्वी बंदी असल्यामुळे या फुलांची कमी किमतीत विक्री करावी लागत होती. जंगलव्याप्त परिसरात फुलांची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. आदिवासीबांधव फुले जमा करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून अत्यल्प दरात खरेदी केली जात होती. नाईलाजाने त्यांना कमी किमतीत विक्री करावी लागत होती. दरवर्षी मार्च ते मे दरम्यान वृक्ष बहरतो. एका मोहवृक्षापासून सुमारे ४० ते ५० किलोग्रॅम व मोहफुले प्राप्त होतात. आतापर्यंत दारू गाळप करण्याकरिता मोह फुलांचा उपयोग केला जात होता. परप्रांतातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. बाजारपेठ बंद असल्यामुळे काही व्यावसायिकांचे चांगलेच फावत होते. आता बाजारपेठ खुली झाल्याने व मोहफुलांनासुद्धा चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनाने या दिशेने पाऊल टाकून मोहफुलावर आधारित उद्योग स्थापन करण्याची गरज आहे.

बॉक्स

मोहफुलाला सुगीचे दिवस

मोहफुलापासून दारू तयार करण्यात येत होती. परंतु मोहफुलाच्या औषधीकरिता पशुखाद्य, शीतपेय, इंधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात मोहफुलाची मागणी व त्याचा भाव येथे अधिक येणार आहे.

प्रक्रिया उद्योग व संशोधनाची गरज

ऊस, संत्रा, धान्य, द्राक्षे, काजू यापासून दारू तयार केली जाते. त्यांच्या कारखान्यांना शासनाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे मोहफुलापासून दारू तयार करणे व औषधात वापर होण्याकरिता प्रक्रिया उद्योगाची व त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. मोहफूल हे औषधीयुक्त असल्यामुळे मोहफूल वृक्ष लागवड चळवळ राबविण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत मिळणार आहे. आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया उद्योग लवकर सुरू होण्याची गरज आहे. आर्थिक विकासाला अधिक चालना मिळेल.