शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी युवक-युवतींनी स्वयंरोजगाराकडे वाटचाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:35 IST

माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता ...

सहषराम कोरोटे : धुर्व गोंड समाजाची १७ जोडपी विवाहबद्धदेवरी : माणूस हा विकासशील प्राणी आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या महागाईला लक्षात घेता आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरिता रोजगाराच्या शोधात इतरत्र कुठेही न भटकता आदिवासी समाजातील युवक-युवतींनी गावातच लहान-लहान लघु उद्योग उभारावे. आपले आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावे. आपण स्वत: आत्मनिर्भर झालो तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि आपला आदिवासी समाज हा प्रगतीपथाकडे वाटचाल करेल. एक विकसीत समाज म्हणून लोक आपल्या समाजाकडे पाहतील. यासाठी आपल्या समाजाचा सर्वांगिण विकास आणि समाजाची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर आदिवासी समाजातील युवक-युवतींनी लहान लघु उद्योग सुरू करून स्वयंरोजगाराकडे आपली वाटचाल करावी, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी केले. ते शनिवार (दि.२२) देवरी तालुक्यातील धामनझोरी-धमदीटोला (घोनाडी) येथे पार पडलेल्या आदिवासी धुर्व गोंड समाजाच्या १७ जोडप्याच्या आदर्श सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते. उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी दीप प्रज्ज्वलन ओराडबांधचे समाज महासभाचे अध्यक्ष धन्नुलाल उईके यांनी केले. धुर्व समाज धमधागडचे केंद्रीय अध्यक्ष एम.डी. ठाकूर, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, जि.प. सदस्य अलताफ हमिद, डीआरडीए सदस्य हरिचंद उईके, तालुका काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, उपाध्यक्ष धनपत भोयर, अमित विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी. रामटेके, सरपंच अंतकला वाढई, ग्रा.पं. सदस्य उदाराम धानगाये, माजी उपसभापती इंदल अरकरा, सुधाकर कोकोडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश राऊत, समाजाचे जिल्हा सचिव राधेलाल सलामे, जिल्हा सदस्य रामेश्वर पदाम यांच्यासह गावागावातून शेकडोच्या संख्येत आदिवासी समाजातील महिला पुरुष व युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. यावेळी १७ विवाहबध्द होणाऱ्या जोडप्यांना मंगलमय सांसारिक जीवनाच्या त्यांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. कोरोटे पुढे म्हणाले, आजच्या दैनंदिन महागाईच्या जीवनकाळात आदिवासी समाजातील लोकांना आपले श्रम, धन व वेळेची बचत करायचे असेल तर आपल्या मुलामुलींचे लग्न अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्यात करावे. ही आजच्या काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान आ. संजय पुराम, एम.डी. ठाकूर, धन्नुलाल उईके, इंदल अरकरा, भरतसिंग दुधनाग, हरिचंद उईके आदींनी उपस्थितांना समायोजित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक माजी पं.स.सदस्य सोनू नेताम यांनी मांडले. संचालन पंचराम मडावी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)