शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यात तहसील कार्यालय अपयशी

By admin | Updated: October 26, 2015 01:56 IST

तालुक्याचा विकास व प्रगतीसाठी मागील वर्षी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. तालुक्यात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्र-उपकेंद्र सुरू करण्यात आले.

गोपालदास अग्रवाल यांचे प्रतिपादन : महालगाव येथे नागरिक समाधान शिबिरगोंदिया : तालुक्याचा विकास व प्रगतीसाठी मागील वर्षी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. तालुक्यात आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्र-उपकेंद्र सुरू करण्यात आले. तसेच रहदारीसाठी रस्त्यांचे जाळे पसरविण्यात आले. याच क्रमाने विभाग प्रयत्न करता तर निश्चितच आणखी विकास होवू शकला असता. आज या नागरिक समाधान शिबिराच्या माध्यमाने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु तालुक्यातील सर्व कार्यांचे केंद्र असलेल्या तहसील कार्यालयात केवळ भ्रष्टाचाराचे जाळे पसरले आहेत. त्यामुळे सामान्य जणांच्या समस्या सोडविण्यात तहसील कार्यालय अपयशी ठरत आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले. गोंदिया तालुक्यातील महालगाव येथे स्थानिक नागरिकांच्या शासकीय समस्या सोडविण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिक समाधान शिबिर घेण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी केएनके राव, तहसीलदार पवार, जि.प. सदस्य व महिला बालकल्याण सभापती विमल अर्जुन नागपुरे, पं.स. सभापती स्रेहा गौतम, पं.स. सदस्य नीता अशोक पटले आदी उपस्थित होते.आ. अग्रवाल पुढे म्हणाले, सामान्य नागरिक आपल्या अधिकाराच्या रेशनापासून वंचित आहेत. तहसील कार्यालयात गळ्यापर्यंत खाण्याचे काम सुरू आहे. एका व्यक्तीच्या जमिनीवर सहजतेनेच दुसऱ्या व्यक्तीचे नाव चढविले जाते. परंतु खऱ्या मालकाचे नाव पुन्हा चढविण्यासाठी वर्षानुवर्षे पेसी चालते. बोगस कागदपत्रांच्या आधारावर दलालांमार्फत एका व्यक्तीचे एकाच दिवसात जात प्रमाणपत्र बनविल्या जाते. मात्र खऱ्या व्यक्तींना महिनोमहिने रांगेत फिरावे लागते. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची भरपाई महिनोमहिने बँकेत ठेवल्या जाते. मात्र शेतकऱ्यांवर मरणाची पाळी येईपर्यंत त्याच्या वितरणाकडे तहसील कार्यालय लक्ष देत नाही. अशास्थितीत सामान्य नागरिकांमध्ये शासनाप्रति रोष पसरले असून शासनाला आता समाधान शिबिर आयोजित करण्याची गरज पडली. जर तहसील कार्यालयात सामान्य नागरिकांचे काम नियमानुसार व वेळेवर करण्यात आले तर समाधान शिबिरांची गरजच पडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.सदर शिबिरात ग्रामीण क्षेत्राशी संबंधित जवळपास सर्वच विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांद्वारे २०० पेक्षा अधिक समस्या निपटाऱ्यासाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश आ. अग्रवाल यांनी संबंधित विभागांना दिले.याप्रसंगी पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, पं.स. काँग्रेस नेते चमनलाल बिसेन, जि.प. काँग्रेस पक्षनेते रमेश अंबुले, जिल्हा परिषद सदस्य सदस्य सीमा मडावी, विजय लोणारे, शेखर पटले, विठोबा लिल्हारे, पं.स. सदस्य अनिल मते, माधुरी हरिणखेडे, हरिचंद कावडे, सारंग भेलावे, इंद्राणी धावडे, योगराज उपराडे, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, जयप्रकाश बिसेन, निता अशोक पटले, प्रिया रणजित मेश्राम, प्रमिला करचाल, खंडविकास अधिकारी वालकर, माजी पं.स. सदस्य कौशल्या बोपचे, लोकचंद दंदरे, मनीष मेश्राम, फत्तेचंद शेंडे, लक्ष्मी रहांगडाले, विद्या भालाधरे, रामेश्वर हरिणखेडे, सरिता अंबुले, दिगंबर बघेले, रणजित मेश्राम, प्रकाश रहमतकर, शोभेलाल पारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)