शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

तालुक्याला गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 6:00 AM

निसर्गाने निर्माण झालेल्या संकटाचा तालुक्याला फार मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह पाणी आणि १२५ ग्रॅम एवढ्या वजनाच्या गारांमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तर गारपिटीमुळे कौलारुंचे घर आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये धान, टरबूज, वांगे, मिरची, काकडी, लौकी, भेंडी या पिकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकऱ्यांचे नुकसान : १५० विद्युत खांब पडले

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील ग्राम टेमनी, हेटी व गिरोला या गावांना गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतमाल आणि घरांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.निसर्गाने निर्माण झालेल्या संकटाचा तालुक्याला फार मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह पाणी आणि १२५ ग्रॅम एवढ्या वजनाच्या गारांमुळे त्या भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तर गारपिटीमुळे कौलारुंचे घर आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्यामध्ये धान, टरबूज, वांगे, मिरची, काकडी, लौकी, भेंडी या पिकांचा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची ही प्रथमच वेळ आहे. शेती आणि घरांची अक्षरश: चाळणी झाली. कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी घटनास्थळी जावून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची मौका चौकशी सुरु केली आहे.आंतरराष्ट्रीय शाळेचे नुकसानगोरेगाव : अवकाळी पावसासह वादळीवाऱ्यामुळे ग्राम हिरडामाली येथील भारतरत्न अटलिबहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेची इमारतीचे नुकसान झाले आहे. गुरूवारी (दि.१२) सायंकाळी ७ वाजतादरम्यान आलेल्या वादळी वारा व पावसामुळे शाळेतील स्वयंपाक गृह, प्रसाधन गृह व वर्ग खोल्यांचे छत उडून गेले आहे.शाळा प्रशासनाच्यावतीने सुमारे एक लक्ष रूपयांचे नुकसान झाले असल्याचे घोषित करण्यात आले. या आर्थिक नुकसानीची भरपाई शासनाने करावी अशी मागणी संबंधितांना करण्यात येईल असे शाळा प्रशासनाने कळविले आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील काही भागात वीज पुरवठा गुरूवारपासून खंडीत होता.रब्बी पिकांचे नुकसाननवेगावबांध : परीसरात गुरूवारी (दि.१२) सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या चहाटपऱ्याही उडून गेल्यातर मोठी झाडेही उन्मळून कोसळली. या पाऊस व गाटपीटमुळे चना, गहू, तुर, उडीद, मुंग, मसूर आधी रब्बी पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे लगेच पंचनामे करुन त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना केल्या आहेत.- मनोहर चंद्रिकापुरेआमदार,अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्र................................वादळीवारा व गारपिटीची सकाळीच प्रत्यक्ष गावात जावून पाहणी केली. हातात आलेल्या पिकांचे आणि घरांच्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी.-रमेश चुऱ्हे, जि.प.सदस्यमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे परिसरात असलेले जवळपास १५० विद्युत खांब पडल्याने त्या गाव व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. एवढे मोठे नुकसान यावर्षी प्रथमच झाले.- जी.पी. काकडे, शाखा अभियंता, वीज वितरण विभाग................................आम्ही लहानपनापासून तर आज ५० वर्ष पर्यंत ऐवढी मोठी गारपीट कधीच पाहिलेली नाही. टिनाचे छत उडाले, घरांचे कवेलू फुटले. आम्ही आमच्या जीव मुठी घेवून रात्र काढली. आता नैसर्गिक वातावरणात आम्ही जिवंत राहतो की नाही अशी अवस्था झाली होती.-लक्ष्मीकांत बिसेन, नागरिक, टेमनी

टॅग्स :Rainपाऊस