शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
5
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
6
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
7
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
8
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
9
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
10
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
11
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
12
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
13
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
14
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
15
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
16
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
17
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
18
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
19
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
20
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!

रेल्वे आणि वनकायद्याच्या कचाट्यात अडकला प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:47 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे काम अर्धवट आहे. परिणामी मागील २० वर्षांपासून दरेकसा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीला सिंचन व्हावे म्हणून बेवारटोला धरणातून एक डावा आणि दुसरा उजवा असे दोन कालवे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

ठळक मुद्देबेवारटोला प्रकल्पाचे दोन्ही कालवे अर्धवट : दलदलकुहीला फटका, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे काम अर्धवट आहे. परिणामी मागील २० वर्षांपासून दरेकसा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीला सिंचन व्हावे म्हणून बेवारटोला धरणातून एक डावा आणि दुसरा उजवा असे दोन कालवे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु उजवा कालवा रेल्वे विभागाच्या मंजुरीअभावी तर डावा कालवा वन कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.उजव्या कालव्याची लांबी ८ किमी प्रस्तावित असून हा कालवा टोयागोंदी चांदसुरज विचारपूर गावाकडे जाणार आहे. याचा लाभ जमाकुडो कोपालगड या गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कालव्याची विसर्ग क्षमता ०.९८ घन मिटर प्रति सेकंद एवढी नियोजित केलेली आहे. हा कालवा टोयागोंदी चांदसूरजपर्यंत तयार झाला असून आतापर्यंत फक्त ३ किमी बांधकाम पूर्ण झाले आहे. तर ५ किमीचे बांधकाम शिल्लक आहे. चांदसुरज-१ आणि चांदसुरज-२ या दोन्ही गावाच्या मधातून मुंबई ते हावडा रेल्वे मार्ग गेलेला आहे. उजवा कालवा रेल्वे मार्ग ओलांडून भूमिगत मार्गाने पुढे काढावा लागेल. यासाठी रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कालव्याचे काम पुढे करताच येणार नाही.दोन दशकापासून रेल्वेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात आले किंवा नाही याबाबत शंका आहे. धरण बांधताना कालव्याच्या अडचणीबद्दल गांभीर्याने प्रकरण हाताळण्याचे काम का करण्यात आले नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. डावा कालवा ६.२० किमी लांबीचा असून या कालव्यातून १.८६ घ.मी. प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग होणार असून या कालव्याचे काम बºयाच प्रमाणात पूर्ण झाले आहे. हा कालवा बंजारी डहाराटोला, धनेगाव, दलदलकुही, मुंशीटोला इत्यादी गावात सिंचन सोय करुन देणारा आहे. वन कायद्याच्या अडचणीने कालवा ज्या ठिकाणावरुन जातो त्या ठिकाणाहून न दाखविता दुसºयाच ठिकाणी दाखविण्यात आला. दलदलकुही गावाला या कालव्याचे पाणी मिळणार असल्याने येथील नागरिक व शेतकरी वन कायद्याची अडचण दूर करुन या गावाजवळून कालवा तयार करण्याची मागणी केली जात आहे.डाव्या कालव्यातून मागील दोन वर्षापासून बंजारी डहारटोला गावाला सिंचनासाठी पाणी देण्याचे प्रयोग करण्यात आले. परंतु कालवा पूर्ण झाला नसल्याने पाण्याचा अपव्ययच जास्त होता. एकंदरीत दोन्ही कालवे कायद्याच्या अडचणीत सापडले असून या अडचणी केव्हा दूर होतील याकडे परिसरातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासनयावर्षी फेबु्रवारी महिन्यात कचारगड यात्रेनिमित्त कोयापुनेम महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धनेगावला येथे आले होते. या वेळी येथील शेतकºयांनी बेवारटोला प्रकल्पाच्या मुद्दा उपस्थित करुन रेल्वेमुळे कालव्याचे बांधकाम रखडले असल्याची बाब केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा गडकरी यांनी रेल्वेची मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच यासाठी एका शिष्टमंडळाला दिल्ली येथे बोलविले होते.

टॅग्स :forest departmentवनविभागrailwayरेल्वे