शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धानाची उचल संथगतीने, कशी होणार रब्बीची खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि ...

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट या दोन्ही विभागांना देण्यात आले आहे. मात्र यंदा गोदामे रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे. रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ही ३० जूनपर्यंत आहे. त्यातच गोंधळात १५ दिवस निघून गेलेले आहे. त्यामुळे उर्वरित पंधरा दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी हाेणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यंदा रब्बीतील धानाचे सरासरी उत्पादन सुध्दा जास्त आहे. त्यामुळे ३५ लाख क्विंटलपर्यंत रब्बीतील धानाचे उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र मागील खरीप हंगामातील धान या दोन्ही विभागाच्या गोदामात तसाच पडला आहे. ३५ क्विंटल धानापैकी राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ तीन लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १०६ खरेदी केंद्र सुरु केले असले तरी यापैकी प्रत्यक्षात किती केंद्रावर धान खरेदी सुरु आहे याची कल्पना शेतकरी आणि जिल्हावासीयांना चांगलीच आहे.

.............

२८२ राईस मिलर्ससह करार

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करुन शासनाकडे सीएमआर तांदूळ जमा केला जातो. यासाठी २८२ राईस मिलर्ससह करार करण्यात आला. या राईस मिलर्सने आतापर्यंत केवळ अडीच लाख क्विंटल धानाची उचल केली आहे. त्यामुळे ३० लाख क्विंटलवर धान अद्यापही धान खरेदी करणाऱ्या विविध संस्थांच्या गोदामांमध्ये पडला आहे. त्यामुळेच रब्बीतील खरेदी केलेला धान ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.

.....

उद्दिष्ट २८ लाख क्विंटल धान खरेदीचे

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला रब्बी हंगामात एकूण २८ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र १५ जूनपर्यंत केवळ ४ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर गोदाम फुल्ल असल्याने अनेक संस्थांची खरेदी बंद आहे. त्यामुळे उर्वरित १५ दिवसात २४ लाख क्विंटल धान खरेदी होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.............

शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात

गोदाम हाऊसफुल्ल असल्याने अनेक संस्थांची धान खरेदी ठप्प आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तर घरी धान ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून ते अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहे. यामुळे अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

............