शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयचे ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित

By admin | Updated: April 27, 2015 00:36 IST

भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडा येथे खाते उघडण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी असते.

तिरोड्यात ग्राहकांची तारांबळ : सेवा केंद्रातून दिले जाते केवळ ओळखपत्रगोंदिया : भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडा येथे खाते उघडण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी असते. त्यामुळे बँकेतील काही कर्मचारी खाते उघडण्यासाठी नागरिकांना बँके समोरच असलेल्या ग्राहक सेवा केंद्रात पाठवितात. मात्र या ग्राहक सेवा केंद्रातून खाते उघडणाऱ्या ग्राहकांना खातेपुस्तिका दिली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित आहेत.ग्रामीण भागातील तसेच काही अल्पशिक्षित व काही वृद्ध व्यक्तींना एटीएम मशीन संचालित करता येत नाही. त्यामुळे त्यांना तिथून पैसे काढणे किंवा इतर प्रक्रिया करणेसुद्धा समजत नाही. असा एखादा व्यक्ती एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला तर फसवणूक व लुबाडणूक करणाऱ्यांचीही काही कमी नाही. शिवाय खातेपुस्तिका नसल्याने आपल्या खात्यात किती रूपये जमा झाले किंवा किती रूपये काढण्यात आले, हे सुद्धा त्यांना कळत नाही. सर्वच शिक्षीत नसल्याने किंवा सर्वांनाच एटीएमची प्रक्रिया समजत नसल्याने खाते पुस्तिकेअभावी भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांना खातेपुस्तिका देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.तिरोडा तालुक्यात लाखेगाव, ठाणेगाव, गराडा, करटी आदी गावांमध्ये एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र आहेत. बेलापूर येथील मायक्रोफायनंस कंपनीमार्फत ते नियुक्त करण्यात आलेले आहेत. तर मायक्रोफायनंस कंपनी व भारतीय रिझर्व बँक यांच्यात करार असल्याचे ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकाने सांगितले. मात्र ग्राहक सेवा केंद्रातून बँक खाते उघडणाऱ्या ग्राहकांना खातेपुस्तिका अद्याप का देण्यात आले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. ग्राहक भारतीय स्टेट बँक तिरोडा येथे जातात, ग्राहक सेवा केंद्रातून मिळालेले ओळखपत्र दाखवून खातेपुस्तिकेची मागणी करतात. मात्र तुम्ही जिथून खाते उघडले तिथे जावून पुस्तिका मागा, असे सांगून बँकेचे कर्मचारी ग्राहकांना परत पाठवितात. या प्रकारामुळे बँक ग्राहकांची तारांबळ उडत आहे. खाते सेवा केंद्रामार्फत उघडले असो किंवा सरळ बँकेतून उघडले असो, शेवटी जमा केलेले पैसे बँकेतच जमा होतात. मग खातेपुस्तिका का दिली जात नाही, असा सवाल ग्राहकांनी केला आहे. या प्रकाराबाबत भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडाचे व्यवस्थापक गजभिये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. (प्रतिनिधी)बँक व्यवस्थापकाच्या कार्यालयात ३५ ते ४० अर्ज याबाबत तिरोडा येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्राचे संचालक अजयकुमार रणगिरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की आम्ही पैसे घेवून नागरिकांना भारतीय स्टेट बँकेचे खाते उघडून देतो. तसेच त्यांना बँक खाते क्रमांक असलेले एक ओळखपत्र देतो. पोस्टाने एटीएम कार्ड आल्यावर याच कार्डाद्वारे सर्व प्रक्रिया ग्राहकांना करावी लागते. तसेच ज्या ग्राहकांना खातेपुस्तिकेची गरज असते, त्यांच्याकडून अर्ज घेवून भारतीय स्टेट बँक शाखा तिरोडाच्या व्यवस्थापकांना ते अर्ज पोहचविले जाते. परंतु ग्राहक सेवा केंद्रातून खाते उघडणाऱ्या ग्राहकांना खातेपुस्तिका का पुरविली जात नाही, हे कळत नाही. सुरूवातीला ज्यांना अत्यंत आवश्यकता होती, त्या दोन ग्राहकांना बँकेकडून खातेपुस्तिका देण्यात आली. यानंतर ग्राहक सेवा केंद्रात खातेपुस्तिकेसाठी ३५ ते ४० ग्राहकांचे अर्ज आले. ते सर्व अर्ज एसबीआयच्या शाखा व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेवून दिले. मात्र अद्यापही त्यांना बँकेकडून खातेपुस्तिका देण्यात आले नाही किंवा तयारही करण्यात आले नाही, असे ते म्हणाले.जन-धन योजनेचे सर्वच ग्राहक खातेपुस्तिकेपासून वंचित सर्वसामान्य नागरिकांना बँकेत शून्य रूपयांत खाते उघडता यावे व विविध लाभ घेता यावे म्हणून प्रधानमंत्री जन-धन योजना शासनाने सुरू केली. मात्र तिरोडा येथील एसबीआय ग्राहक सेवा केंद्रामार्फत जन-धन योजनेची खाती उघडणाऱ्या सर्वच ग्राहकांना खातेपुस्तिकेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या खात्यांमध्ये ग्राहकांनी रूपये जमा करणेसुद्धा सुरू केले आहे. रूपये जमा असल्यावरही बँक खातेपुस्तिका देत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये रोष व्याप्त आहे. इतर बँक या योजनेचे खाते उघडणाऱ्या ग्राहकांना पुस्तिका उपलब्ध करून देतात, मग स्टेट बँक का नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शिवाय या योजनेचे एटीएम कार्ड तीन-तीन महिने लोटूनही मिळत नसल्याने आर्थिक व्यवहार करणे कठिण होत आहे. सर्वच प्रकारच्या ग्राहकांना भारतीय स्टेट बँक शाखेने खातेपुस्तिका उपलब्ध करून द्यावे व त्यावर आर्थिक व्यवहाराची छपाईसुद्धा बँकेमार्फतच करण्यात यावी, अशी ग्राहकांची मागणी जोर धरत आहे.