शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

३५५३ वाहनधारकांकडून वसूल केला पाच लाख रुपयांचा दंड

By admin | Updated: November 18, 2015 01:50 IST

दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह ...

दीड महिन्यातील कारवाई : वाहतूक नियमांची पायमल्लीगोंदिया : दिवाळीच्या धामधुमीत वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक, बेशिस्त पार्र्किंग यासह विविध वाहतूक नियमांचे धिंडवडे काढणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. दिवाळीच्या एक महिना आधीपासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत पाच लाखांच्या घरात दंड वसूल करण्यात आला.दिवाळीच्या एक महिना अगोदरपासून जिल्हाभरात वाहतुकीसंदर्भात कारवाई करण्याचे धाडसत्र वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून राबविण्यात आले. गोंदिया जिल्हा वाहतुक पोलिसांनी आॅक्टोबर महिन्यात अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या २१५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूल केला आहे. या अवैध वाहतुकीत एक कार असून त्याच्याकडून २ हजार रूपये दंड वसूल केला आहे. १३ जीप चालकांकडून २५ हजार ४०० रूपये, ३ मेटॅडोर चालकांकडून ४ हजार रूपये, ६ ट्रॅक्टर चालकांकडून ६ हजार रूपये, १० ट्रॅव्हल्स चालकांकडून २१ हजार रूपये, ६५ टॅक्सी चालकांकडून ६५ हजार २०० रूपये, ११७ आॅटोरिक्षाकडून ३९ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३१४१ इतर वाहन चालकांकडून ३ लाख २१ हजार १०० रूपये वसूल करण्यात आले. आॅक्टोबर महिन्यात एकूण ३३५६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चार लाख ७४ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या १५ दिवसात गोंदियाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने १९७ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १९ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. या पंधरवड्यात जिल्ह्यात वाहनांवर झालेल्या कारवाईची माहिती महिनाअखेर मिळणार असल्याने दिवाळीच्या सणातील पंधरवड्यात झालेली कारवाई आॅक्टोबर महिन्याच्या तुलनेत मोठी असल्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत दिड महिन्याच्या आत पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)वाहन चालकांना सिग्नलचे भान नाहीशहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी गोंदिया शहराच्या चौका-चौकात बसविण्यात आलेले सिग्नल पाहूनच वाहन चालकांनी आपले वाहन चालविणे आवश्यक आहे. परंतु अनेक वाहन चालक हे सिग्नल तोडून वाहने नेतात. त्यामुळे एकाच्या बरोबर इतरही वाहन चालक तोच प्रकार करतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असतो. मात्र जलद वाहने हाकणाऱ्या त्या व्यक्कीला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे संतुलन ढासळेल व अपघात होईल म्हणून त्याचा पाठलाग केला जात नाही.