शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आमगावचे रेणुकानगर चार महिन्यांपासून पाण्यात

By admin | Updated: May 2, 2015 01:41 IST

पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे.

आमगाव : पाणी हे जीवन असते. त्याला विनाशापासून वाचवा, या पाटबंधारे विभागाच्या ब्रिदला तिलांजली देण्याचे काम आमगावचा पाटबंधारे विभाग करीत आहे. मागील चार महिन्यापासून रबि पिकासाठी दिले जाणारे पाणी शेतीला मिळत नाही. उलट ते पाणी आमगावच्या रेणुकानगर, राजाभोज नगर व न्यायालयाच्या मागील भागात मागील चार महिन्यापासून वाहात आहे.रबी पिकासाठी पाटबंधारे विभागाने मागील चार महिन्यापासून पाणी वाहात आहे. मागील चार महिन्यात कितीतरी पाणी वाहून गेले. या पाण्यामुळे या परिसरात घर बांधणाऱ्या लोकांचे सिमेंट खराब झाले. विहीरीतील पाणी खराब झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमगावच्या न्यायालयामागील भाग परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे. रेणुकानगरातील लोकांना रस्त्याने जाणे कठीण झाले आहे. या नगरातील रस्ते कच्चे असल्यामुळे उन्हाळ्यातही गुडघाभर पाण्यातून तेथील लोकांना ये-जा करावी लागते. मागील चार महिन्यापासून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाटबंधारे विभागाचे कालवे अनेक ठिकाणातून भग्न असल्यामुळे कालव्यातील पाणी शेतीला न मिळता सरळ लोकवस्तीतून वाहात आहे. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांना चिखलातून ये-जा करावी लागते. त्रस्त झालेल्या लोकांनी वाया जाणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून लोकांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले. तेथील शाखा अभियंता एफ.पी. राठोड यांना या वाहत्या पाण्याची माहिती दिल्यावर राठोड यांनी त्या नागरिकांश्ी अरेरावी करून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा आम्ही काय करणार असा उलट प्रश्न नागरिकांना केला. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी पाटबंधारे विभागाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. मागील चार महिन्यापासून पाटबंधारे विभागाच्या उदासिनतेमुळे लाखो रूपयाचे पाणी वाहून गेले आहे. शाखा अभियंत्यांना सांगूनही त्यांनी या प्रकराकडे लक्ष दिले नाही. परिणामी चार महिन्यापासून राजाभोज कॉलनी व रेणुका नगरातील लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाया गेलेल्या पाण्याचा भूर्दंड राठोड यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बोरसरे, डॉ. पाथोडे, जांभूळकर, रामटेके, मेश्राम, लांजेवार व नागवंशी यांनी केली आहे.