शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेतीमधून आशेचा किरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST

बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा ...

बोंडगावदेवी : निकोप व कीटकनाशक विरहित शेती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीची कास धरल्याशिवाय जमिनीच्या व मानवी आरोग्यात सुधारणा शक्य नाही. जमिनीची सुपीकता खालावली आहे. विविध रासायनिक खते व कीटकनाशके औषधांच्या सततच्या वापरामुळे शेतीची सुपीकता कमी झाली. जमिनीची भूक भागवून सुपीकता कायम ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणे काळाची गरज आहे. सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी एक आशेच्या किरणासह वरदान असल्याचे प्रतिपादन नावीन्यपूर्ण प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी केले.

तालुक्यातील आसोली येथे आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षणात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शाश्वत शेती अभियान २०२०-२१ जमीन आरोग्य पत्रिका अंतर्गत आसोली येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणा प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यादवराव मसराम, ललीत सोनवाने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, मंडळ कृषी अधिकारी सुधीर वरकडे, कृषी पर्यवेक्षक नरेश बोरकर, दुधराम नाकाडे, भिवा नाकाडे, दयाराम काळसर्पे उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र राऊत म्हणाले, सेंद्रिय खत, शेण खत, जैविक, हिरवळी खत, जोर खते वापरूनच जमिनीचे आरोग्य पूर्ववत करू शकतो. जमिनीचे आरोग्य सांभाळणे काळाजी गरज आहे. रासायनिक खतांचा वापर सुरू राहिला तर जमिनीची सुपीकता मृतप्राय झाल्याशिवाय राहणार नाही. ललीत सोनवाणे म्हणाले, फळबाग, अद्रक, प्लास्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. भाताची शेती आजघडीला तोट्याची झाली आहे. पाण्याची उपलब्धता असूनसुद्धा केवळ भातपिकाचेच उत्पादन घेतले जाते. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. ऊस, केळी, मका, भाजीपाला या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. महिलांनी शेतीपूरक व्यवसाय करून घर संसारास हातभार लावण्यासाठी पुढे यावे. मंडळ कृषी अधिकारी वरकडे यांनी शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य होणार नाही, असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वनाथ कवासे, चिंतामण मसराम, रजनिश मेश्राम, प्रमोद खोटेले, संध्या बडोले यांनीसुद्धा शेतीविषयक मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे संचालन पंकज सूर्यवंशी यांनी केले तर आभार भारती येणे यांनी मानले.