शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आता आम्ही आमच्या गावाचे रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 6:00 AM

कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव : गावकऱ्यांचा गावबंदीचा निर्णय

लालसिंह चंदेल।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युध्द स्तरावर उपाय योजना केल्या जात आहे. त्यात आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सुध्दा पुढे येत आहे. कोरोनाचा आपल्या गावामध्ये शिरकाव होऊ नये म्हणून आता गावकऱ्यांनी गाव बंदीचा निर्णय घेत आहे. तर काही ग्रामपंचायतीनी गाव दक्षता समित्या स्थापन करुन गावाच्या प्रवेशाव्दारावर ग्राम रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक असे चित्र आहे.कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने शासन आणि प्रशासनातर्फे उपाय योजना केल्या जात आहे. देशात सर्वत्र संचारबंदी लागू करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुध्दा यासाठी आता पुढाकार घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच गावांनी गाव बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावकऱ्यांची परवानगी न घेता गावात प्रवेश करणाऱ्यांना अडीच हजार रुपयांच्या दंडाची सुध्दा तरतूद केली आहे. ऐवढेच नव्हे तर गावात कोणतेही वाहन अथवा बाहेरील नागरिक प्रवेश करु नये यासाठी गावाच्या प्रवेशव्दारावर लाकडे आणि झाडाच्या फांद्या टाकून मार्ग अडविण्यात आला आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा आणि पांढरी येथे गावकऱ्यांनी गाव दक्षता समितीची स्थापना करुन ग्राम सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे. गावातील युवक पाळी पाळीने गावाच्या प्रवेशाव्दारा पहारा देत असून गावाबाहेरील व्यक्तीस गावात प्रवेश करण्यास मज्जाव करीत आहे. तर असाच निर्णय देवरी तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतने सुध्दा गावातील युवकांची ग्रामरक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे युवक गावाच्या प्रवेशव्दारावर दिवसभर पहारा देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता आम्हीच आमच्या गावाचे रक्षक ही संकल्प रुढ होत असल्याचे चित्र आहे. ही सर्व उपाय योजना आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहावे,त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आहे.त्यामुळे गावकरी देखील यात सहकार्य करीत असल्याचे चित्र आहे.गावांमध्ये सॅनिटायझेशन फवारणी करण्यास सुरूवातकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता ग्रामपंचायतीने सुध्दा पुढाकार घेतला आहे.गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील केशोरीसह अनेक ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझर आणि डासनाशक फवारणी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत