शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकतेत बैलजोडीच्या घुंगरांचा आवाज लुप्त

By admin | Updated: March 25, 2015 01:14 IST

जमाना वायफायचा आहे. इंटरनेट व्हॉट्सअपच्या काळात बदल जलद झाले हे कळलेच नाही. संपर्कासाठी एक ना अनेक माध्यमे आली.

अर्जुनी-मोरगाव : जमाना वायफायचा आहे. इंटरनेट व्हॉट्सअपच्या काळात बदल जलद झाले हे कळलेच नाही. संपर्कासाठी एक ना अनेक माध्यमे आली. त्यासोबतच वाहतुकीची शेकडो माध्यम सुध्दा वर्तमानात वाढली आहेत. प्रत्येक गावात माल वाहतुकीसाठी छोटा गाडी असतेच. मालवाहक गाड्यानी घुगरांची गाडी म्हणजेच महाराष्ट्राची एक ओळख सांगणाच्या बैलगाडीला कधिचेच मागे टाकले परंतु आजही तिचे महत्व कमी झालेले नाही.काही वर्षे मागे पाहिले तर दळणवळणाच्या सोयी तर दुरची गोष्ट. परंतु पक्का डांबरी रस्ता सुध्दा ग्रामीण भागात नव्हता. दुरवर असलेल्या नातलगाची खुशाली. घेण्यासाठी पोस्ट कार्यालयात किंवा ट्रॅक कॉल बुक करावा लागत असे. आता हातात मोबाईल आल्याने सार काही एकदम सहज आले आहे. वाहतुकीच्या बाबतीत विचार केल्यास बैलगाडीच वाहतुकीचे प्रभावी माध्यम होते. काळ बदलला ताबड्या रस्त्याचे काळे पांढरे रस्ते झाले. यंत्रतंत्राची वाहने आली सार काही बदल झाले. पण बदलत्या काळात मात्र बैलगाडी काही प्रमाणात अस्तित्व टिकवून आहे. ग्रामीण भागातील काही शेतकरी शेतमाल आजही बैलगाडीने अड्याळ येथील आठवडी बाजारात नेत आणत असल्याचे आढळते. परंतु तो आवाज नाही आणि बैलबंड्याची संग सुध्दा पहायला मिळत नाही. पूर्वी गोंदिया जिल्ह्यातील काही ठराविक आठवडी बाजारात दुकान लावायला जागा उरत नव्हती. उलट नाइलाजास्तव दुकान बंडीत व बैल कोणाच्याही घरच्या आडाला बांधुन ठेवावे लागत असे. आज जागा आहेत दुकाने नाहीत आणि ज्यांचे दुकाने आहेत त्यांचे व्यवसाय होत नाही.काही वर्षाआधी याच बैलगाडी शिवाय ग्रामीण भागात वाहतुकीचा अन्य पर्याय नव्हता मग कुणाचा लग्न असो वा कुठली जत्रा. रात्रीला सोबत दिवा असला की झाल समाधान एकाच वेळी २०-२० बैलगाड्या एकामागे एक जशी रेलगाडीच लागली. वाटेतल्या प्रवासात एकमेकांना ओव्हरटेक करुन मिशीला ताव मारण्याची गमत निराळीच.वाहतुकीची माध्यमे वाढली प्रत्येक गावात मालवाहक टेम्पो आले व बैलगाडी मागे पडली. शेतकऱ्यांच्या घरी पॉवर टिलर टॅक्ट्रर आल्याने बैलजोडी बाळगणे अव्यवहार्य वाटू लागल्याने याचा परिणाम बैलगाडी वाहतुक बंद पडण्यावर आला. पण म्हणून काय तिचे महत्व कमी झालेल नाही. जलद वाहतुकीच्या कितीही सुविधा निर्माण झाल्या तरी ग्रामीण जिवनाचा अविभाज्य भाग बनलेली बैलगाडी बैलाच्या घुंगराचा आवाज मात्र मंदावला आहे. (प्रतिनिधी)