शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

६ हजार ३१३ महिलांचे मातृवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे.

ठळक मुद्देलाभासाठी कोणतीही अट नाही : पहिल्या अपत्याच्या वेळी मिळतात पाच हजार रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाल आणि माता मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. जननी शिशू सुरक्षा योजनेपासून माहेर घर, हिरकणी कक्षापर्यंतच्या सोयी गर्भवतींसाठी केल्या जात आहे. मात्र यानंतरही मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे गर्भवतींना पहिल्या अपत्यासाठी शासन मातृ वंदन योजनेतंर्गत पाच हजार रूपयांचे अनुदान देत आहे.ग्रामीण भागातील गर्भवती महिलांची गर्भावस्थेत योग्य काळजी घेतली जावी व त्यांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तीन टप्यात पाच हजार रूपये केंद्र शासनाने देण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकार मार्फत गरोदर महिला-स्तनदा मातेस पाच हजार रूपये पंतप्रधान मातृ वंदन योजनेतून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीे हा अनुसूचित जाती, जमाती व द्रारिद्रय रेषेखालील असावा अशी कोणतीही अट नाही. पहिल्या अपत्यासाठी नोकरदार महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा सेविका यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या व्यतिरीक्त जननी सुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्यात येणार आहे.लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यावर (डीबीटी) ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी लाभार्थीचे खाते क्रमांक व आधार क्रमांक आवश्यक आहे.६३१३ महिला पात्रसन २०१९ या वर्षात गर्भवती झालेल्या महिलांपैकी जी महिला पहिल्यांदाच गर्भवती झाली त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यात १२ हजार १६ महिला गर्भवती असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. यातील सहा हजार ३१३ महिला पहिल्यांदाच गर्भवती असल्याचे पुढे आले आहे. या महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे.असा मिळणार लाभगर्भवतीच्या नोंदणीवेळी एक हजार रूपये देण्यात येते. यासाठी गर्भवती होण्याच्या १५० दिवसांत नोंदणी करणे आवश्यक आहे. गरोदरपणाला सहा महिने पूर्ण होताच दोन हजार रूपये देण्यात येतील. त्यासाठी किमान एक तपासणी करणे आवश्यक आहे. प्रसूतीपश्चात बालकाची जन्मनोंद व पेंटाव्हॅलन्ट ३ रा डोज दिल्यानंतर (१४ आठवडे) लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसऱ्या टप्यातील दोन हजार रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना