शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मृत वडिलास जिवंत दाखवून जमिनीची रजिस्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 00:36 IST

मृत वडिलाला जिवंत दाखवून दुय्यम कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री केल्याच्या प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तपास केले नाही.

काचेवानी : मृत वडिलाला जिवंत दाखवून दुय्यम कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री केल्याच्या प्रकरणात तिरोडा पोलिसांनी तपास केले नाही. आरोपीला वाचवण्यासाठी व आरोपमुक्त होण्यासाठी तत्कालीन तपास पोलीस अधिकाऱ्याने महत्वाचे पुरावे जवळ दडवून ठेवले व न्यायालयात सादर केले नाही. त्या अधिकाऱ्यांची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांना देण्यात आली आहे. गुन्ह्यात वाढ करण्यासंबंधी अर्ज न्यायालयात जोडण्यात आले आहे. तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील कुवरलाल उंदर रहांगडाले यांनी गावच्या सदाशिव देविलाल कटरे यांना जमिनी विक्री केली. याची रजिस्ट्री दुय्यम निबंधक तिरोडा येथे रजिस्ट्री क्र. (तरर १८५/१९९९ दिनांक ६/२/१९९९) करण्यात आली होती. यात विक्री करणाऱ्यांनी मेलेल्या वडिलास जिवंत दाखवून खोटी रजिस्ट्री करून शासनाची व सर्वांची फसवणूक केली होती. रजिस्ट्री वेळी खोटे नमुना सातबारा जोडणे, मृताला जिवंत दाखवणे, खोट्या स्वाक्षऱ्या करणे अशा आरोपाची तक्रार तिरोडा पोलिसात व उच्च अधिकाऱ्यांना ११ जून २०१२ ला करण्यात आली होती. तिरोडा पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीला नव्याने एफआयआर नोंदविण्यास सांगितले. १७ जानेवारी २०१४ रोजी फिर्यादी नेतराम माने यांनी तक्रार नोंदवली. भादंवि ४१९,४२०,३४ गुन्हा नोंद करण्यात आला. तपास अधिकारी सुनील यादव यांनी २७ दिवसातच न्यायालयात आरोप पत्र दाखल केले. यादव यांनी गुन्हेगाराची बाजू घेण्यास कोणतीही कसर सोडली नाही. न्यायालयात आरोप पत्र सादर करताना फिर्यादीने तक्रारीसोबत जमिनीचे जुने गट क्र.५१० अ व ५१० ब आणि नवीन गट ६२८ व ६२९ चे सातबारा प्रत, फेरफार नोंद प्रती या हेतुपुरस्पर जोडले नाहीत. त्यामुळे याचा लाभ आरोपींना मिळणार, अशी खात्री पोलिसाला होती. तलाठी साजा-१० मेंदीपूरचे तलाठी वंजारी यांनी परि.पोलीस उपअधीक्षक तिरोडा यांना ११ मार्च २०१३ ला गट नं. ६२८ व ६२९ चे सातबारा उतारा, ८-अ, फेरफार क्रं. ८९ नमुना ६ क प्रत, नमुना ६ फे.क्रं. ४६, १७२, १९३ व ३३० अशा प्रतिंसह संपूर्ण रेकार्ड दिला. यापैकी एकही प्रत न्यायालयातून मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात महत्वाचे पुरावे सादर केले नसल्या समजते.प्रकरण काय आहे?सदर प्रकरण जमीन खरेदी विक्रीचा असून गट क्रमांक ५१० अ व ५१० ब (०.३२ व ०.१५) ची चकबंदी १९८९ ला करण्यात आली. अर्थात हे गट व आराजी बंद झाले. हे पुराने गट उंदर, पोतन आणि मोतीराम जानू रहांगडाले यांचे नावे होते. चकबंदीनंतर १९९१ ला नव्याने ६२८ व ६२९ गट तयार झाले. उंदर जानू रहांगडाले हे १ डिसेंबर १९९२ ला मृत झाल्याने फेरफार क्रं. ४६ नुसार ५ जानेवारी १९९३ ला वारसान संपत उंदर रहांगडाले, कुवरलाल उंदर रहांगडाले व मुलगी मालन पटले हे या जमिनीचे मालक असल्याची मोहर राजस्व विभागाने लावली. ४ फेब्रुवारी १९९९ ला जमिनी विक्री करून रजिस्ट्री (क्र.१८५) करण्यात आली होती. फेरफार (क्र.१९३) १ जानेवारी २००० ला करण्यात आले. जिवंतपणी ४ फेब्रुवारी ९९ ला विक्री केल्याचे नमूद केले आहे. उंदर रहांगडाले हे १९९२ ला मरण पावले तर १९९९ मध्ये जमीन विकण्यासाठी जिवंत झाले कसे? १ जानेवारी २००० च्या फेरफारमध्ये दुसरे खातेदार पोतन रहांगडाले उपस्थित दिसून येत नाहीत. फेरफार ४६ नुसार १९९३ ला नवीन रेकार्ड तयार झाला, तर १९८९ पूर्वीच्या रेकार्डचा उपयोग कसा करण्यात आला.पोलिसाने सावकारी प्रकरणातही वाचविले मृत वडिलास जिवंत दाखविण्याच्या आरोपात अडकलेला कुंवरलाल उंदर रहांगडाले (कृषी सहायक) याच्यावर सावकारी प्रकरण ५६/२०१२ कलम ३२ (ब), ३३,३४ अंतर्गत न्यायालयात प्रकरण सुरू होते. या प्रकरणाचा तपास पोलीस सुनील यादव यांच्याकडे होता. त्यावेळी त्यांना असे काही जमिनीसंबंधी पुरावे हाती लागले असते. गुन्हा दाखल ९ सप्टेंबर २०१२ ला झाला. पुन्हा अडकण्याच्या भीतीने क्रं.(तरर १७१७ दि. १७/९/२०१२) नुसार रजिस्ट्री करून दिली आहे. त्यांनी ही जमीन रजिस्ट्री क्र.तरर २३५/१९९८ दिनांक अशाच प्रकारे रजिस्ट्री क्र. (२५०८/१९९७) २३ जुलै १९९७ ला आपल्या नावे जमिनीची रजिस्ट्री करून घेतली होती. तपास अधिकाऱ्याने अधिक तपास केला असता तर असे अनेक प्रकरण समोर आले असते, अशी प्रतिक्रिया त्यावेळी नागरिकांमध्ये होती.