शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी पाण्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:28 IST

यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते.

ठळक मुद्देयेरंडी गावाची व्यथा : मालकी हक्क असूनही पुरेसे पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : यावर्षी बळीराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. येरंडी हे गाव मालकी हक्क नवेगावबांध तलावाच्या अधिकार क्षेत्रात येते. पण या येरंडी परिसरातील शेतीला कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. अशी व्यथा या गावचे शेतकरी नेहमी मांडतात.येरंडी गावात दरवर्षी पावसाळी शेतजमिनीवर शंभर टक्के पेरणी केली केली जाते. मात्र शेतातील पीक टिकविण्यासाठी धान पिकाच्या शेवटपर्यंत पाणी आवश्यक असते. नवेगावबांध मालकी हक्क क्षेत्रात नरेगाव, देवलगाव, खोलीबोंडे, येरंडी व मुगली असे पाच गावे येतात. या मालकी हक्क क्षेत्रात फक्त नवेगावबांध, देवलगाव आणि लागून असलेला खोलीबोंडे हेच गावे पिकतात. पण येरंडी व मुंगली ही गावे पाण्याच्या अभावाने चांगली शेती पिकवत नाही. पुरेसे पाणी मिळत नाही, हे यामागील प्रमुख कारण आहे.नवेगावबांध तलावाचे पाणी या पाच गावांना मोफत मिळत आहे. पण कुणाला मायेचा तर कुणाला मावशीचा, असा प्रकार केला जातो. या तलावाचे पाण्याविषयीची पूर्ण अधिकार काय? हे समजत नाही. याकडे नवेगावबांध सार्वजनिक बांधकाम कार्यालय लक्ष देत नाही, असे शेतकरी सांगतात व चिंता व्यक्त करतात.या तलावाचे पाणी कधीच उंचीवर असलेल्या शेतकºयांच्या शेतात पोहोचत नाही. येरंडीला नवेगावबांध मार्गावरच्या शेतीला फक्त कसेतरी ओढूनताणून पाणी मिळते. पण कुंभीटोला या मार्गावरील कालव्याला पाणी बरोबर मिळत नाही. या क्षेत्राचे पाणी कमी करण्यात आले आहे. कालवा केरकचºयाने ग्रासला आहे. तर नवेगाव, देवलगाव इकडेच पाणी अडतो. या पाण्यावर नवेगावचेच शेतकरी आपली मालकी गाजवतात आणि येरंडी गावाला पुरेसे पाणी सोडत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.हल्ली तलावात जवळपास सात फूट एवढे पाणी आहे. तरी पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. अशा प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तलावाच्या पाण्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा कानाडोळा आहे. ते जबाबदारी घेत नाही. शासनाकडून कोट्यवधी रुपये तलावाच्या कामासाठी खर्च केले जातात. पण शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. येरंडीच्या शेतकºयांना पुरेसे पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.येरंडी भागाकडील पाणी कमी करण्यात आले आहे. मी समितीला सांगितल्यावर ते करतील, पण पाण्यासाठी वरचे शेतकरी ओरडत आहेत. त्यांची मागणी पूर्ण करू आणि पाणी पुरेसे देवू.इंजि.बी.बी. बिसेनशाखा अभियंता, नवेगावबांध