शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
3
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
4
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
5
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
6
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
7
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
8
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
9
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
10
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
11
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
12
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
16
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
17
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
20
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांची अफरातफरी चौकशीत उघड

By admin | Updated: December 3, 2014 22:52 IST

तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कहाली येथील ग्रामसेवक के.व्ही. तावाडे यांच्यावर १० लाख २५ हजार ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती सालेकसाने जिल्हा

सालेकसा : तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कहाली येथील ग्रामसेवक के.व्ही. तावाडे यांच्यावर १० लाख २५ हजार ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचा चौकशी अहवाल पंचायत समिती सालेकसाने जिल्हा परिषदेला पाठविला. परंतु अजूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे सदर ग्रामसेवकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अभय देण्यात येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
ग्रामसेवक के.व्ही. तावाडे यांची बदली करण्यात यावी, त्यांच्या कारभाराची चौकशी करावी म्हणून ग्रामपंचायतचे पदाधिकारी तथा गावकरी यांनी पंचायत समिती सालेकसा येथे ९ आॅक्टोबर २०१३, ३ नोव्हेंबर २०१३, १० मार्च २०१४, ३१ जुलै २०१४ रोजी लेखी तक्रारी दिल्या. परंतु या तक्रारींना प्रशासनाने केराची टोपली दाखविली व अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकासोबत असल्याचे दाखवून दिले. ग्रामपंचायतचा निधी खर्च करण्यात आला. पण रोकडवहीला नोंद नाही. प्रमाणके उपलब्ध नाहीत. पर्यावरण संतुलित ग्राम समृध्दी योजनेची नियमबाह्य ८५ हजार रुपयांची प्रमाणकाशिवाय काढून अफरातफर करणे, याबद्दलची चौकशी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केली. १० लाख २८ हजार ६१३ रुपयांची अफरातफर केल्याचा व नियमबाह्य खर्च केल्याचा चौकशी अहवाल खंडविकास अधिकारी व्ही.के. पचारे यांनी जिल्हा परिषदेला पाठविला. पण जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी काहीच कारवाई केली नाही. शासकीय निधीचा अफरातफर करणे म्हणजे भादंविच्या कलम ४२० चा गुन्हा होतो. पण पोलीस ठाण्याला कुणीही तक्रार नोंदविली नाही. मागे आर्थिक अफरातफरीच्या बाबतीत मटाले ग्रामसेवकाबद्दल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती व त्यांना तुरूंगाची हवासुद्धा खाली लागली होती.
जिल्हा परिषद सदस्या प्रेमलता दमाहे यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत या विषयावर प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यांनाही प्रशासनाने सहकार्य केले नाही. १५ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामसभेत गावकऱ्यांनी जमा-खर्चाचा हिशेब मागितला. पण सदर ग्रामसेवकाने हिशेब दिला नाही. तेव्हा तीन तास ग्रामसेवक तावाडे यांना गावकऱ्यांनी खोलीत बंदिस्त करून ठेवले होते. मासिक बैठकीत किंवा ग्रामसभेत कोणतेही ठराव न करता मनमर्जी काम ग्रामसेवक करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
तावाडे यांच्याकडे असलेल्या बोदलबोडी व लिंबा ग्रामपंचायतीचा कारभार तेथील नागरिकांच्या तक्रारीनुसार काढण्यात आला. परंतु एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन पाच तक्रारी गावकऱ्यांनी पंचायत समितीत केल्यावरही त्यांची बदली करण्यात येत नाही. यावरून कुठेतरी पाणी मुरत आहे, अशी चर्चा गावकऱ्यांत आहे. काही ग्रामसेवकांचे बदली आदेश काढण्यात आले.परंतु एकही ग्रामसेवकाच बदली आदेश काढण्यात आले. परंतु एकही ग्रामसेवक कहाली या ग्रामपंचायतीत रुजू झाला नाही. अधिकाऱ्यांनी फक्त गावकऱ्यांना भूलथापा देऊन वेळकाढू धोरण स्वीकारलेले आहे. म्हणूनच गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला खोलीत बंदिस्त केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
नवीन ग्रामसेवक कहाली येथे रुजू होत नसतील व ग्रामसेवक तावाडे यांची बदली होत नसेल तर पंचायत समितीचे प्रशासन किती ढिसाळ आहे व ग्रामसेवक अधिकाऱ्यांना ऐकत नाही, अशी अवस्था येथील पंचायत समितीची झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्रयच सदर ग्रामसेवकाला मिळून भ्रष्टाचाराला वाव मिळत आहे. तेव्हा आता तरी या ग्रामसेवकाची बदली होणार काय? असा प्रश्न गावकरी एकमेकांनाच विचारत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)