शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती.

ठळक मुद्देनदी, नाले तुडुंब : अनेक मार्ग बंद : वस्त्यांमध्ये साचले पाणी, पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडले, गेल्या २४ तासांत १०१.८१ मिमी.

पावसाची नोंदलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील २-३ दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गुरूवारी (दि.२०) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.२१) दुपारी १२ वाजतापर्यंत कायम होता. त्यामुळे मागील २४ तासांत १०१.८१ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले भरून वाहत होते. त्यामुळे सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील काही गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटला होता.जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील कावराबांधसह काही गावात पुराचे पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. पावसामुळे सालेकसा ते तिरखेडी, सालेकसा ते नानव्हा, भजेपार ते सालेकसा, भजेपार ते साखरीटोला, बोरकन्हार अंजोरा, देवरी ते आमगाव हे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. गोंदिया ते कोहमारा मार्गावर सुद्धा पाणी असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. तिरोडा ते तुमसर मार्गावरील बिरसी येथील पूल पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे तिरोडा तालुक्याचा तुमसरशी संपर्क तुटला होता. गोंदिया बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील जुना पूल पाण्याखाली आता होता. तर पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील नदी नाले तुडूंब भरून वाहत होते. शेतांमधील पाणी रस्त्यांवरु न वाहू लागल्याने रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. तर आमगाव शहरातील ३-४ वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

टॅग्स :Rainपाऊस