शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पुरामुळे गोंदिया जिल्ह्यातील ७०५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:33 PM

२६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्दे१३ हजार ५६२ शेतकरी भरपाईस पात्र ८ कोटी ९४ लाख रुपयांची मदत मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला होता. या नुकसानीचे कृषीे आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात ७०५९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल या दोन्ही विभागाने शासनाकडे पाठविला होता.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होवून त्याचा धानपिकांना मोठया प्रमाणात फटका बसला होता. तसेच घरांची सुध्दा पडझड झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. केंद्राच्या चमूने सुध्दा जिल्ह्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली होती. अतिवृष्टी आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावांना पुराचा फटका बसला. जवळपास ३ दिवस धानपिक पाण्याखाली राहिल्याने संपूर्ण धान सडले. तर काही शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेली. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मते १५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. पण कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७०५९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याचा अहवाल सुध्दा शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासनाने नुकसान भरपाईपोटी ८ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नुकसान भरपाईसाठी १३ हजार ५६२ शेतकरी पात्र ठरले आहेत. नुकसान भरपाईचा निधी सुध्दा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून त्याचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे.

नुकसानीच्या तुलनेत मदत अल्पचपुरामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील १५ हजार हेक्टरवरील धान पिकाचे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी वाहून गेल्याने त्यांना पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले. पण त्यातुलनेत शासनाने मंजूर केलेली नुकसान भरपाईची रक्कम फारच कमीे असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेतीfloodपूर