शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद

By admin | Updated: April 6, 2015 01:45 IST

जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची देयके न काढल्यामुळे कंत्राटी पद्धतीवर मागील वर्षापासून सुरू असलेली रामपुरी

१० गावांतील पाणी पुरवठा खंडीत : नागरिकांचा आंदोलनाचा इशारा नवेगावबांध : जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची देयके न काढल्यामुळे कंत्राटी पद्धतीवर मागील वर्षापासून सुरू असलेली रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराने शनिवारपासून (दि.४) बंद केली. यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या १० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात उपस्थित झालेला आहे. यावरुन जिल्हा परिषद सामान्य माणसांच्या सोई-सुविधांबाबद किती जागरुक आहे हे लक्षात येते.कोट्यवधी रुपये खर्च करुन शासनाने प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार केली. परंतु सदर योजना चालवायची कुणी असा प्रश्न निर्माण झाला. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कुलूप ठोको आंदोलन केले. त्या आंदोलनाचे यश म्हणून जिल्ह्यातील अनेक पाणी पुरवठा योजना सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला होता. अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेली रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना याच आंदोलनानंतर सुरू झाली. यासाठी ई-निविदेच्या माध्यमातून कंत्राटही देण्यात आले. सुरुवातीला १६ लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली. १ आॅगस्ट २०१४ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून रामपुरी, येरंडी/दर्रे, एनोडी (जांभडी), तिडका, धाबेपवनी, जब्बारखेडा, रोजीटोला, कोहलगाव, कान्होली व धाबेटेकडी या १० गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. कंत्राटदारांनी योजना सुरू केल्यानंतर कार्याची देयके जिल्हा परिषदेकडे सादर केली असता वित्तविभागाने ती काढली नाहीत. आजघडीला सुमारे आठ लक्ष रुपये जिल्हा परिषदेकडे थकीत असल्याचे सांगण्यात येते. वास्तविकपणे ई-निविदेनंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्याने या निविदेची मुख्य लेखाधिकारी यांच्याकडून आर्थिक मंजुरी घेणे आवश्यक होते. परंतु तसे करण्यात आले नाही. त्यामुळे कंत्राटदारांची देयके अडविण्यात आल्याचे समजते. परंतु कार्यकारी अभियंत्यांच्या चुकीचे खापर कंत्राटदाराच्या डोक्यावर फोडण्याचे कारण मात्र समजत नाही. हा तर चोर सोडून सन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार दिसून येत आहे.लोकप्रतिनिधींच्या आंदोलनामुळे कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने योजना सुरू करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले असले तरी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन लेखाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक दृष्टिकोनातून ही योजना पूर्ववत सुरू ठेवणे गरजेचे होते. परंतु जि.प.तील अधिकाऱ्यांनी नियमांचा बडगा दाखवून आपला अहंकार संतुष्ट केला व यामध्ये १० गावांतील नागरिक मात्र भरडल्या जात आहेत. याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. जिल्हा परिषदेने सामान्य नागरिकांच्या सोईसुविधांचे काम करायचे की अधिकाऱ्यांच्या अहंकाराची संतुष्टी करायची हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. पाण्यासाठी या १० गावांतील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. (वार्ताहर) झाशीनगर योजना निर्मितीची गरज काय?राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत ४६ लाख रुपये खर्चाच्या झाशिनगर पाणीपुरवठा योजनेला जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मंजुरी दिली. यासाठी झाशीनगर येथे विहिर खोदकाम व पंप हाऊसची निर्मिती नव्याने करण्यात येणार आहे. वास्तविक रामपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन झाशीनगरपासून अवघ्या एक किलोमिटर अंतरावरुन गेलेली आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून झाशीनगरला अत्यल्प खर्चात बारमाही पाणी मिळू शकते, असे असतानाही ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे नव्या योजनेला मंजुरी देणे ही अनाकलनिय बाब आहे, असा आरोपही होत आहे. बडोलेंनी लक्ष घालावेप्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठीच राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात येत आहे. ना. बडोलेंच्याच मागील वर्षीच्या आंदोलनाने अनेक पाणी पुरवठा योजना सुरू झालेल्या होत्या. मागील वर्षी तर विद्यमान पालकमंत्री विरोधी पक्षाचे आमदार होते. सध्या ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी जि.प.मधील अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेला आळा घालून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.