शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकाच्या खरेदी-विक्रीत शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त

By admin | Updated: November 16, 2014 22:53 IST

जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन्

परसवाडा : जो व्यापारी शेतकऱ्यांजवळून पीक घेतो, त्याला अधिक भाव मिळत आहे. मात्र विकणाऱ्यांवर शासनाचे बंधन नाही. केवळ शेतकऱ्यालाच हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त अन् व्यापारी मस्त अशी स्थिती आहे. आता शासन व्यापाऱ्यांबद्दल कोणते पाऊल उचलते का? असा सवाल शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विचारला आहे.भारत कृषिप्रधान देश आहे. येथील जनतेचे जीवन कृषीवरच अवलंबून आहे. पण शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला कोणीच तयार नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान, पाणी व इतर बाबींवर अवलंबून पीक घेतले जाते. अधिकतर खाद्योपयोगी वस्तू, पीक भारतात तयार होते. पण काही पिकांना प्रोसेसिंग करून तयार केले जाते. त्यांना थोडीफार कशीतरी किंमत मिळते. पण शेतकऱ्यांना डच्चूच दिल्या जातो. जे शेतकरी आपल्या मुलाबाळांसह रात्रंदिवस राबराब राबतात, त्यांच्या पिकांना कधीही भाव मिळत नाही, ही येथील शोकांतिका आहे.डब्बेटोला येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. रामलाल दुर्गा पारधी यांचे पुत्र सूरजलाल रामलाल पारधी (६५) यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले की, आम्ही स्वातंत्र्य संग्राम सेनानीचे फायदे घेतलेच नाही. आणि आता शेतात मरमर करूनही फायदा मिळत नाही. आठ एकर शेती असूनही कधी पिकांना भाव नाही तर कधी कर्जबाजारी व्हावे लागते. कधी पाणी नाही तर कधी पिकांना कीड लागते. खत, औषधी व मजुरांचे दर गगणाला भिडले. अशात जिल्ह्यातील धान पिकाला भाव किती मिळतो? कधी हजार तर कधी नऊशे! हमी भाव तर गायबच झाले. तसेच हमी भावासाठी डंका पिटणारे शेतकरी पुत्रही गायबच झाले. ४० वर्षांपूर्वी २० रूपये क्विंटल धानाला भाव होता. मजुरांना एक कुडो धान देत असत. तरीही परवडत असे. मजुरी कमी, रासायनिक खतांचा वापर कमी, दरसुद्धा कमी. सर्व कमीच असायचे. पण आजघडीला उत्पादन जास्त असूनही परवडत नाही. खत, पाणी, वीज, औषधीचे दर व इतर सोयींचा हिशेब केला तर शेतकऱ्यांच्या हाती शून्य हिशेब येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, कसे येतील त्यांचे चांगले दिवस, असे प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे आहेत. मात्र चांगले दिवस तर आले, पण ते व्यापारी वर्गाचे. हमी भावही गेले, खरेदी केंद्रही गेले, सर्वकाही गेले आणि नेते गप्पच बसून राहिले. शेतात बोअर करून पाणी काढले. कर्जही काढले आणि आता परतफेडीचा प्रश्न समोर आहे. पीकही आले, पण खर्च केलेले पैसे व पिकांचे पैसे बरोबर झाले. मेहनतही गेली आणि कर्जबाजारी झाले. आता ते पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचा वालीसुद्धा कुणी नाही. अशा शब्दात वयोवृद्ध शेतकरी सूरज पारधी यांनी आपल्यासह इतर शेतकऱ्यांची व्यथा कथन केली. (वार्ताहर)