शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जि.प. सदस्य करणार एक गाव स्वच्छू

By admin | Updated: November 22, 2014 23:04 IST

स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर,

गोंदिया : स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१४ दरम्यान स्वच्छ ग्राम योजना राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला कार्यक्षेत्रातील किमान एक गाव स्वच्छ ग्राम करावे लागणार आहे. स्वच्छ ग्राम योजनेंतर्गत एका वर्षात जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करावयाच्या असून या योजनेंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यासह सर्वच जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील एका गावाची निवड करून त्याचे पालकत्व स्विकारून त्या गावाला स्वच्छ ग्राम करावयाचे आहे. यासाठी निवड करताना गावे ही शक्यतो निर्मल भरत अभियानात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीतूनच निवड करुन ती नावे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे द्यावी लागणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही निधीची तरतुद करण्यात आलेली नसून प्रत्येकाने आपले गाव आपलीच जबाबदारी समजून लोकसहभागाने व श्रमदानाने हे काम करायचे आहे. स्वच्छ ग्राम योजनेत सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होवून किमान आठवड्यातून एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान करावयाचे असून गाव स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहे. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, ग्रा.पं.सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा २६ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, असे पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून कळविण्यात आले.