शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्याभोवती अतिक्रमण

By admin | Updated: August 12, 2014 00:01 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक बांधून त्यांच्या आठवणींची जाणीव नव्या पिढीत रुजावी, त्यांच्या प्रेरणेने नव राष्ट्रनिर्माण व्हावे या हेतूने येथे राष्ट्रपीता

आमगाव : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मारक बांधून त्यांच्या आठवणींची जाणीव नव्या पिढीत रुजावी, त्यांच्या प्रेरणेने नव राष्ट्रनिर्माण व्हावे या हेतूने येथे राष्ट्रपीता महात्मा गांधीचा पुतळा उभारण्यात आला. परंतु स्वातंत्र्याच्या या शिल्पकाराच्या पुतळ्याला अतिक्रमणाचा विळखा पडत आहे. येथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आहे. अनेक स्वातंत्र्यविरांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीला धुडकावून काढण्यासाठी लढा उभारला. या लढ्यात स्वातंत्र्य लढा देणाऱ्यांना विरगती मिळाली तर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख पुढारी होते. त्यांच्या स्वातंत्र्याच्या तत्वज्ञ बुद्धीने स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. अंहिसात्मक असहकार आंदोलनाने गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अंहिसात्मक मार्गानी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्यांनी जगाला प्रेरित केले. परंतु बदलत्या आधुनिकीकरण व लोकप्रवाहात स्वातंत्र्यविरांना प्रशासन व लोकं विसरत चालल्याची जाणिव या हुतात्म्यांच्या स्मारकांच्या होणाऱ्या हालीमुळे होते.शहराच्या मध्यभागी मागील २५ वर्षापूर्वी महात्मा गांधींचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पूर्वी खुटा चौक नावाने संबोधल्या जाणाऱ्या चौपदरी रस्त्याचे नाव आज गांधी चौक म्हणून ओळखले जात आहे. परंतु पुतळा उभारुन महात्मा गांधींच्या या पुतळ्याचे लोकार्पण झाले नाही. परंतु या महात्म्याला लोकांनी श्रद्धेने दैवत माणून त्यांच्या अर्धकृती पुतळ्याची जोपासना काही काळ केली. कालांतराने या स्मारकाभोवती राजकीय पुढाऱ्यांच्या पोस्टरांनी वेढा घातला. देखरेखीअभावी पुतळ्याजवळ अतिक्रमण झाले. कचऱ्याचे ढिगारे पसरले. परंतु स्थानिक प्रशासनाने दखल घेतली नाही. तर वाढत्या वाहतुुकीमुळे पादचाऱ्यांना रहदारीस निर्माण होणारी अडचण आता या स्मारकामुळे होत असल्याची ओरड पुढे आली आहे. त्यामुळे महात्मा गांधींचे स्मारक आता जड होऊ लागले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यविरांचे स्मारक विरळ होत चालले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या त्या विरांची स्मृती जोपासण्याची तसदी देखील आज प्रशासनाकडून घेतली जात नसेल तर या स्वातंत्र्याच्या अर्थच काय असा सवाल मात्र काही सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)