शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची हुलकावणी, पेरणीवर परिणाम

By admin | Updated: June 28, 2014 01:11 IST

साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १७०० ते २००० मि.मी. पावसाची सरासरी असते.

सालेकसा : साधारणत: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १७०० ते २००० मि.मी. पावसाची सरासरी असते. परंतु यंदा ही सरासरी ८०० ते १००० मि.मी.पर्यंत अडकून राहिली. पावसाने दडी मारल्याने आतापर्यंत निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात करण्यात आलेली पेरणी फक्त ६० टक्के बियाणे अंकुरीत झाले आहे.
४० टक्के बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे किंवा उशिरा अंकुरीत होण्याची शक्यता आहे. अथवा अत्याधिक पावसाचा फटका बसल्यास सडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा मृग नक्षत्रात पावसाचे वाहन हत्ती होते. परंतु हत्याने अल्पश: प्रमाणात पाऊस पाठविले त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. पेरणी केल्यावर मात्र आवश्यक असलेला पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकलेल्यापैकी आत दबलेले बियाणे अंकुरीत झाले.परंतु वर असलेले बियाणे तसेच पडून राहीले. पावसाअभावी ते निकामी झाले व मोठ्या प्रमाणात पक्ष्याचे आहार बनले. आता आर्द्रा नक्षत्र सुरू आहे. या नक्षत्रतात पावसाची दमदार हजेरी असते. परंतु पाच दिवस लोटून ही पावसाची हुलकावणी कायम आहे. यंदा आर्द्रा नक्षत्रात पावसाचे वाहन मोर आहे. परंतु आतापर्यंत मोराने दमदार पावसाचे आवाहन करीत आनंदीत होण्याचा काम केला नाही, असे दिसत आहे. आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस उर्वरीत पेरणीचे काम पूर्ण करण्यात मदत करतो. त्याच बरोबर जमिनीची नागरणी करून तीचे मशात करणे व रोवणीसाठी सज्ज करण्यात मदत मिळते. परंतु आतापर्यंत दमदार पाऊस न पडल्याने शेतीचे सर्वच को रखडण्याच्या मार्गावर आहेत. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी ठरत असल्याचे दिसत असून शेतकरी वर्गासह कृषी विभाग व शासनाचे इतर घटकसुध्दा चिंतेत सापडले आहेत. पुढील आवाहनाना कसे सामोर जावे याचे आत्ममंथन करण्यात लागले आहेत. शासनाने किती ही पर्यायी उपाययोजना आखल्यातरी दुष्काळाची भरपाई कधीच पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांनीसुध्दा सावध पवित्रा घेत शेतीत आपला भांडवल लावणे गरजेचे आहे.
जेणेकरून पुढे होणारा नुकसान कमी होऊ शकतो. शेवटी निसर्ग रुसला आणि शेतकरी फसला असेच सिध्द होते. भारताची शेती ही मान्सूनवर अवलंबीत असते. मान्सून वेळेवर व योग्य प्रमाणात आला तर शेतीला लाभ होतो अन्यथा सर्वप्रकारे नुकसानच नुकसान म्हणून भारतात शेतीला मोठा जुगाराचा खेळ मानतात. या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण १२५ ते १५० मि.मी. असल्याने येथील शेतकरी सर्वत्र भात पिकाची लागवड करीत असतात. (प्रतिनिधी)