शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

दीड लाख लोकांची तहान भागविणारी डांर्गोली योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 6:00 AM

तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळमेळ थोडाफार जुळला नसल्याने पाणी टंचाईची थोडीफार झळ सोसावी लागली होती.

ठळक मुद्दे८९.७५ लक्ष लिटर पाणी पुरवठा। पाच टाकींमधून होतो शहराला पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून शहराला पाणी पुरवठा करणारी डांर्गोली पाणी पुरवठा योजना शहरासाठी जीवनदायीनी ठरत आहे.शहराला दररोज ८९.७५ लक्ष लिटर पाणी पुरवठा या योजनेतून केला जात असून शहरातील पाच पाणी टाकींमधून पाण्याचे वितरण होत आहे. शहरासाठीच्या या पाईप लाईनवर सुमारे आठ गावे असून त्यांचीही स्वतंत्र योजना असल्याने पाण्याचा प्रश्न कधी या गावांमध्ये निर्माण झाला नाही.तलाव व जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात ऋतुंचा मेळ निसर्गचक्रप्रमाणे असल्याने येथील जनजीवनावर फारसा दुष्परिणाम होत नाही. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा असल्याने तिन्ही ऋतूंचा संगम येथे बघावयास मिळतो. मात्र मागील २ वर्षांत पावसाचा ताळमेळ थोडाफार जुळला नसल्याने पाणी टंचाईची थोडीफार झळ सोसावी लागली होती. पण जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे डोंर्गोली येथील योजनेतून शहराची ही समस्या यशस्वीरित्या सोडविण्यात आली होती. सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम डांर्गोली येथील वैनगंगा नदीतून शहराला पाणी पुरवठा केला जातो.यासाठी लगतच्या ग्राम कुडवा येथे जलशुद्धीकरण केंद्र असून तेथून शहरातील वेगवेगळया भागात असलेल्या पाच टाक्यांत पाणी दिले जाते. अशाप्रकारे दररोज ८९.७५ लक्ष लिटर पाणी या टाक्यांत जात असून त्यांच्याद्वारे शहरात पुरवठा केला जातो. म्हणूनच डांर्गोली योजनेला गोंदिया शहराची जीवनदायीनी म्हटले जाते.गावांचीही स्वतंत्र व्यवस्थाडांर्गोलीपासून गोंदियाला येत असलेल्या पाईपलाईन लगत ग्राम डांगोरली, दासगाव, निलज, गिरोला, लहीटोला, पांढराबोडी, जब्बारटोला व कुडवा ही गावे आहेत.यातील बहुतांश गावांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आहे. शिवाय, गावातील विहिरी व बोअरवेलमुळे त्या गावांत पाणी पुरवठा होत असून कधी पाणी पेटल्याची स्थिती निर्माण होत नाही. परिणामी, पाण्याची चोरी किंवा पाण्यासाठी आंदोलनाची पाळी उद्भवलेली नाही. त्यातल्या त्यात एखाद्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यास किंवा देखभाल दुरूस्तीला घेऊन झालेली पाणी गळती सोडून अन्यथा पाणी गळतीची समस्याही जाणवत नाही.१५ हजार हेक्टरवर सिंचनडांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रालगत डांर्गोली उपसा सिंचन योजना तयार करण्यात आली आहे. या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून परिसरातील १५ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात येथील पाण्याची मदत होते.जब्बारटोला गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. पाऊस कमी प्रमाणात झाल्यास थोडी समस्या जाणविते. मात्र भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.- दिलीपसिंह गहरवार, गावकरीदासगाव येथे पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र सुविधा आहे.शिवाय पाण्याचे स्त्रोत देखील अधिक असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईची फारशी समस्या जाणवित नाही. या भागात अद्याप पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसून स्थानिक ग्रामपंचायत यासाठी उपाय योजना राबवित असते.- पंचम गिरी, गावकरीगोंदिया तालुक्याला लागूनच वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे या भागातील पाणी पातळी नेहमी चांगले असते. शिवाय सिंचनासाठी सुध्दा या नदीच्या पाण्याचा उपयोग शेतकरी करतात. या भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत नाही.- मुकेश जगणे

टॅग्स :DamधरणWaterपाणी