शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन-बडोले

By admin | Updated: December 29, 2014 01:41 IST

जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे.

अर्जुनी/मोरगाव : जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात दहावी व बारावी शिकलेल्या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमूख बनविण्याचे विचाराधीन आहे. नवबौद्ध व्ही.जे. एन.टी. प्रवर्गातील या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळू शकतो. जिल्ह्यात स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र विचाराधीन असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. ते भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, मंत्रीपद मिळाले हा माझा नाही तर जनताजनार्दनाचा सन्मान आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मेळावा घेण्याचा प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला येणार. यासाठी शेतकऱ्यांनी हिरमुसून जाऊ नये, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला. राज्य सरकारवर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने तिजोरीवर दरोडा टाकून आर्थिक व्यवस्था खोकली केली. २६ जानेवारीपर्यंत एक शिबिर घेऊन जास्तीत जास्त लोकांना वनजमिनीचे पट्टे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोेलणी झाली असल्याचेही सांगीतले. तसेच झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा एक टप्पा मार्चपर्यंत पूर्ण होणार व येत्या तीन ते चार महिन्यांत या योजनेचे पाणी नवेगावबांध तलावात पडेल. तर बोंडगावदेवी पर्यंतच्या शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कलपाथरी सिंचन प्रकल्प, उपाशा नाल्याचा वनजमिनीचा प्रश्न, डव्वा मायनर, जुनेवानी तलावासाठी निधीची तरतूद, १३२ के.व्ही. विद्युत उपकेंद्राचा प्रस्ताव, अर्जुनी मोरगाव तालुक्यासाठी १०० विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेचा प्रस्ताव या विषयांवर सुद्धा सातत्याने अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असून हे सर्व प्रश्न निकाली काढू असेही ते म्हणाले. समाजकल्याण विभागाचे जिल्हा व राज्य असे दोन भाग आहेत. यात अनेक आश्रमशाळा, वस्तीगृहांचा समावेश असतो. वस्तीगृहाचे निरीक्षणच होत नाही. भविष्यात यासाठी तालुकास्तरापर्यंत कर्मचारी नेमून व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी मंचावर माजी आ. दयाराम कापगते, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, प्रभारी तालुकाध्यक्ष रघुनाथ लांजेवार, जि.प.चे बांधकाम व अर्थ सभापती प्रकाश गहाणे, पं.स.चे सभापती तानेश ताराम, जि.प.चे समाजकल्याण सभापती कुसन घासले, कृउबासचे सभापती काशिम जमा कुरेशी, नामदेव कागपते, अ‍ॅड. दिलीप कातोरे, प्रमोद लांजेवार, जि.प.सदस्य मधुकर मरस्कोल्हे, अरविंद शिवणकर, रुपाली टेंभुर्णे, लुनकरण चितलांगे, सरपंच किरण खोब्रागडे, दिलीप चौधरी, केवळराम पुस्तोडे, उमाकांत ढेंगे उपस्थित होते.याप्रसंगी खा. पटोले म्हणाले, आता आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेचे ऋण फेडायचे आहे. तालुक्यात सिंचन, रोजगार, शेतकरी, बेरोजगार व जातीधर्माचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेस -राकाँ सरकारने आमचे हक्काचे पाणी अदानीला विकले. शेतीला सिंचन व शेतीवर आधारीत उद्योग निर्मिती यासाठी प्रयत्न केले जातील. सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांची चमू आणली पाहिजे. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. संचालन रचना गहाणे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)काळे झेंडे दाखविलेच नाहीशेतकऱ्यांना धानावर उत्पादित भाव मिळावा, विजेचे बिल माफ करावे, जिल्ह्यात शेतकऱ्यांची दैनावस्था असताना दुसरीकडे आमदारांचा सत्कार होतो. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र पोलिसांनी को-आॅप बँक चौकात त्यांना अडकविले. त्यामुळे काळे झेंडे दाखविण्याचा कार्यक्रम फसला. या कार्यक्रमाचे नेतृत्व मनोहर चंद्रीकापुरे, जीवन लंजे, बंडू भेंडारकर, नामदेव डोंगरवार, शीला उईके, शीला दखणे, चित्ररेखा मिश्रा, सोनदास गणवीर, राकेश लंजे, गोवर्धन ताराम करणार होते. धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाववाढ मिळावी, विद्युत दरवाढ मागे घ्यावी या मागण्यांचा समावेश होता.खरेदी विक्री समितीने वर्षभरापूर्वी गाळे भाड्याने दिले. मात्र या व्यापारी संकुलाचे उद्घाटन रविवारी (दि.२८) ना. राजकुमार बडोले यांनी केले. खरेदी विक्री समितीच्या या कार्याची चर्चा समारंभस्थळी होती.