शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: December 27, 2014 22:54 IST

मुख्य मार्गावर अस्ताव्यस्त वाहतूक व ठिकठिकाणी पार्किंग केलेली वाहने दिसून येतात. गेल्या काही वर्षात शहरात वाहनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ वाहन

गोंदिया : मुख्य मार्गावर अस्ताव्यस्त वाहतूक व ठिकठिकाणी पार्किंग केलेली वाहने दिसून येतात. गेल्या काही वर्षात शहरात वाहनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ वाहन आल्यामुळे शहरात वाहतुकीच्या शिस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने अपघाताच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते.
शहरात वाहनांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. शालेय विद्यार्थ्यांजवळही वाहने आली आहेत. परंतु त्या तुलनेत सुरक्षित वाहने चालविण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या शहरातील वाहतूक अतिशय जोखमीची ठरत आहे. बालाघाट ते पुढे आमगाव व गोरेगावकडे जाणारा मुख्य मार्ग हा शहरातून जातो. आमगावहून देवरी होत छत्तीसगड तर बालाघाट मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बालाघाट मार्गावरील ग्राम नागरा ते आमगाव मार्गावरील फुलचूरपर्यंत तसा शहरी भाग व रहिवासी क्षेत्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असात खासगी प्रवासी वाहनांची अधिकची भर पडते. अशावेळी वाहतूक पोलीस मात्र बघ्यांची भूमिका घेताना दिसून येतात.
शहरातील मरारटोली बस स्थानक, नेहरू चौक, जयस्तंभ चौक परिसर आदी ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ठिय्या असतो. अतिशय बेशिस्तीत येथे वाहनांची गर्दी हमखास दिसून येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच त्रास होतो. येथील जसस्तंभ चौकात तर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयासमोरच प्रवासी वाहनांचा गराडा असतो व त्यापासून अडथळा होत असूनही पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. हप्ता वसुलीच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून मोठी रक्कम नियमतिपणे मिळत असल्यामुळे पोलिसांची या वाहनांवर कारवाई करण्याची हिम्मत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नियोजनशून्य पोलीस व्यवस्थेमुळे नागरिकांना मात्र जोखिम स्वीकारून रस्त्याने ये-जा करावी लागते.
उल्लेखनीय म्हणजे महिला व विद्यार्थी वर्गाला या अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका सहन करावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षकांना विचारले असता ते मनुष्यबळाची कमतरता तसेच नगर परिषदेचे असहकार्य ही कारणे सागंतात. एकंदर केवळ आपल्या अंगावरील घोंगडे दुसऱ्याच्या अंगावर टाकणे एवढा एकच प्रकार विविध शासकीय विभागांकडून सुरू असून जनतेच्या सोयीचा मात्र सर्वांनाच सोईस्कररीत्या विसर पडल्याचे दिसून येते. शहरात वाढत्या अवैध वाहतुकीमुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलांना चांगलीच कसरत करीत रस्त्याने जावे लागते. याबाबत नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे. विद्यार्थी व सर्वसामान्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले असून पोलिसांचा वाहतूक विभाग नेमका काय करतो, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक विभागाची कार्यप्रणाली तशी नेहमीच वादग्रस्त आहे. वाहतूक पोलीस दुचाकी चालकांवर आपला जोर आजमावतात. गाडीसमोर आडवे होऊन गाड्यांची चाबी काढून घेण्या इतपत वाहतूक पोलीस धजावले आहेत. दुचाकीवाले दिसले की त्यांना कागदपत्र विचारून थेट चालान किंवा १०० ची नोट घेऊन सोडले जाते. सध्या हा प्रकार सर्वच चौकांत दिसून येत आहे. वाहतूक पोलीस चौका चौकांत दिसून येत असून या रस्ताने निघाल्यास प्रत्येक चौकात नियुक्त कर्मचारी चालान फाडताना हमखास दिसून येत आहे. त्यांचा हा पराक्रम मात्र फक्त दुचाकीवाल्यांसाठीच आहे. तर चारचाकी वाहनांच्या झेडी कुणीही जात नाही. बाजारात चालायला रस्त्यावर जागा राहत नाही. अशात एखादी दुचाकी रस्त्यावर दिसली की तिला उचलून नेले जाते. मात्र चारचाकी उभी पाहून वाहतूकीला त्रास होत असला तरिही कुणी त्याकडे लक्ष देताना दिसत नाही. यातून वाहतूकीचे नियम फक्त दुचाकीवाल्यांसाठीच आहेत काय असा सवाल आता शहरवासी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने दुकानदारांचे अतिक्रमण काढले. मात्र ही मोहिम आता थंडावली आहे. अशात चार दिन की चांदनी सारखाच हा प्रकार दिसून येतो. (शहर प्रतिनिधी)