शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून बांधकाम सुरू असलेला गोंदियातील नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार झाला आहे. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दूसरीकडे हलवून रस्ता मोकळा करणे गरजेचे असल्याचे मानले जात आहे. मात्र हे काम सध्याच करणे अशक्य दिसत असल्यामुळे पुलाच्या उतारापासून तर पुतळ्यापर्यंत रस्ता दोन भागात विभागण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या पुलाचे लोकार्पण लवकरच होणार अशी आशा निर्माण झाली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}