शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्त तंटामुक्त समित्या झाल्या उदासीन

By admin | Updated: May 7, 2015 00:32 IST

महाराष्ट्र शासनाने सन २००७ वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली. गावात शांतता राहावी, ...

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २००७ वर्षापासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली. गावात शांतता राहावी, वादविवाद होणार नाहीत. गावातील कोणतेही वाद न्यायापर्यंत पोहोचणार नाही याची दखल घेऊन गावात समित्या स्थापन केल्या. आता मात्र त्या समित्यांची आगेकूच थांबली असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे. या योजनेची उद्दिष्ट्ये सफल करण्यासाठी अनेक गावे या मोहिमेंतर्गत तंटामुक्त झालीत. वर्षानुवर्षे न्यायालयात धुळखात पडलेली प्रकरणे निकाली लागली व गावात चैतन्य निर्माण झाले. या नऊ वर्षाच्या काळात आमूलाग्र बदल घडून आला. मागील चार वर्षातच तंटामुक्त अभियानाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर चमकू लागला. तंटामुक्त गाव घोषीत करण्यासाठी शासनाने काही अटी व नियम ठेवले होते. त्यामध्ये दारुबंदी, सामूहीक विवाह सोहळा करणे, सर्वधर्म समभाव, धार्मिक सलोखा निर्माण करणारे उपक्रम, महिला सक्षमीकरण, पुतळ्यांची देखरेख व त्यांच्या जयंती उत्सव व पुण्यतिथी, आंतरजातीय विवाह आदी अनेक उपक्रमाचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला. पुरस्काराच्या हेतूने काही तंटामुक्त समित्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले. गावात दारुबंदी व व्यसनमुक्ती करून अनेकांचे उद्ध्वस्त संसार पुन्हा थाटले. पती-पत्नी मधील वाद मिटवून त्यांच्या प्रकरणाला मार्गी लावून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण केले. याशिवाय अनेक चांगले उपक्रम राबवून गावाला नंदनवन करणे, याद्वारे गावाला लाखो रुपयाचे बक्षीस मिळाले परंतु आजही अनेक गावाचे हाल जैसे थे असे झाले आहे. अभियानापुर्वी वाहणारा दारुचा महापूर पुन्हा सुरु झाला. आता तर पुरस्कारप्राप्त गावातील तंटामुक्त समितीचे पदाधिकारीच व्यसनाधिन झाल्याचे चित्र दिसत आहेत. एकंदरीत समित्या उद्दिष्टाच्या पलिकडे घसरायला सुरुवात झाली आहे. काही गावात मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेचे विनियोग करण्यात बऱ्याच आल्या आहेत. या मोहीमेतील वास्तव म्हणजे अनेक गावात केवळ कागदोपत्रीच अनेक उपक्रम राबविण्यात आले. दारुचा महापुर सुरु असताना कागदोपत्रीच दारु मुक्तता झाली. प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आणि रेकॉर्ड वेगळा अशी आगळीवेगळी परिस्थिती असतानासुद्धा गावे तंटामुक्त झाली हे केवळ कशासाठी तर पुरस्कारासाठी काही का असेना परंतु काही गावात शांतता निर्माण झाली. गावे दारुमुक्त झाले व आदर्शतेची वाटचाल सुरु झाली. पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन गाव तंटामुक्त केले मिळालेल्या पुरस्काराकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण त्या समित्याची आगेकुच थांबली असल्याचे दिसत आहेत. (तालुका प्रतिनिधी)