शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५० वर्षांनी लागले कटंगला फळ

By admin | Updated: April 27, 2015 00:29 IST

ग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते,

१०० ते २०० रूपये किलो : विविध स्वादिष्ट व्यंजनांसाठी उपयोगविजय मानकर सालेकसाग्रामीण भागात काटेरी बांबूची झाडे असतात, त्यांना कटंग म्हणतात. कटंगला ६० वर्षांनी फळ लागते, अशी माहिती वृद्ध सांगतात. त्यांच्यानुसार सन १९६६ मध्ये कटंगच्या झाडांना फळ लागले होते. त्यानंतर ५० वर्षांनंतर आता सन २०१५ मध्ये परिसरात सर्वत्र कटंगला फळे लागली आहेत.कटंगाचे लाकूड मजबूत व टिकावू असून ग्रामीण भागात कौलारू घरांसाठी केला जातो. शिवाय इमारती व इतर कामासाठी वापर केला जातो. कटंगाचे खाली पडलेले फळ गोळा करून त्यांचे तांदूळ तयार करून भाकरी बनविल्या जातात. तसेच काही लोक ते तांदूळ विकून अर्थार्जन करीत आहेत. प्रथम कटंगाचे फळ व त्यापासून तयार होणारे तांदूळ पाहून अनेकांना नवल वाटत आहे. कटंगचे फळ जवच्या फळासारखे असते. त्यापासून तयार केलेले तांदूळ गव्हासारखे दिसतात. मात्र त्यात चिकटपणा कमी असल्याने पोळीऐवजी भाकर बनविणे जास्त सोईस्कर असते. या भाकरीचा स्वाद मिळताजुळता तांदळाच्या भाकरीसारखा असतो. वयोवृद्धांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कटंग ६० वर्षांनी एकदा फळाला येतो. मात्र या वेळी ५० वर्षांनी फळाला आले असून, १० वर्षांपूर्वीच कसे फळाला आले, याचे आश्चर्य वयोवृद्धांना होत आहे. त्यांच्यानुसार, कटंगचे झाड एकदा फळले की आपोआपच नष्ट होते व पुन्हा काही कामाचे नसते. पुढे प्रकृतीने नवीन झाड उगवले तर पुढील काळात फळ येतात, असे म्हणतात. यावर्षी सर्वत्र कटंगच्या झाडांना बहर आला असून प्रत्येक झाड जुने असो किंवा नवे सर्वांना कटंग फळलेले दिसत आहे.कटंगाचे झाड रांझी स्वरूपात असून याची जाडी बांबूपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असून मजबूत असते. एकाच तनाला खालीपासून वरपर्यंत काटेरी शाखा असतात. त्यामुळे प्रत्येक बुडापासून निघालेले तन व त्यांच्या शाखा एकमेकात फसलेली असतात. या झाडावर चढने शक्य नसते. त्यामुळे खाली पडलेले फळ गोळा करणे सोईस्कर ठरते. आरोग्यवर्धक कटंगचे तांदूळतांदूळ व गव्हामध्ये असणारे पोषक तत्त्व कटंगमध्ये असतात. प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. पाचक, स्वास्थवर्धक, पोटांच्या विकारावर विशेषकरून यकृताच्या विकारावर लाभदायक असते. कटंगपासून बनणाऱ्या तांदळाचे भात, खीर, लाडू व इतर व्यंजन बनविले जाते. तसेच पिठापासून भाकर, भजे, खीर, मुष्ठे, थापोडे यासारखे स्वादिष्ट व्यंजन तयार केले जाऊ शकतात. कटंगच्या तांदळाला किंवा पिठाला इतर अन्नधान्यातही मिसळून उपयोगात आणले जातात. ग्रामीण भागातील लोकजीवनात एकदा तरी कटंगाचे भात किंवा भाकर खाल्यास स्वत:ला भाग्यवान समजले जाते. त्यामुळेच कटंगाचे तांदूळ १०० ते २०० रूपये प्रतिकिलोप्रमाणे विकले जाते. खाण्याची आवड असलेले लोक पैशाची पर्वा न करता खरेदी करून घेतात.दुष्काळात कटंगच्या तांदळाचा वापरसन १९६६ मध्ये मोठा प्रमाणात कटंगला फळ आले होते. त्यावर्षी सर्वत्र कोरड्या दुष्काळाचा फटका बसला होता. अन्नधान्याचा अभाव झाला होता. तेव्हा अनेक लोक कटंगचे फळ गोळा करून त्यापासून मिळणाऱ्या तांदळाने आपला उदरभरण करीत दिवस भागवेत होते, असे सांगितले जाते. परंतु आता ५० वर्षांनी मोठे परिवर्तन घडले असून अन्नधान्याचे भरपूर भांडार असल्याने केवळ शौक किंवा आवड तर काही जन आठवण म्हणून कटंगच्या तांदळाचा उपयोग करीत आहेत.