शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५५६ गावांसाठी ८५.६७ लाखांचा निधी

By admin | Updated: December 29, 2014 23:44 IST

जि.प. च्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्यात येते. त्यासाठी शासन निधी पुरवितो. यावर्षी जिल्ह्यातील एकूण ५५६ गावांसाठी

राष्ट्रीय आरोग्य अभियान : ग्रामस्थांचे आरोग्य व इतर सुविधांसाठी होणार खर्चगोंदिया : जि.प. च्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्यात येते. त्यासाठी शासन निधी पुरवितो. यावर्षी जिल्ह्यातील एकूण ५५६ गावांसाठी शासनाने ८५ लाख ६७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांचे आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र निधी मंजूर असून उपलब्ध नसल्याने संबंधित विकास कामांना फटका बसत आहे.जिल्ह्यात ५५६ ग्रामपंचायती आहेत. हा निधी खर्च करण्यासाठी एक समिती गठित करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे सरपंच तर सदस्य सचिवपदी त्या गावातील अंगणवाडी सेविका असते. दोघांच्या नावे बँकेत खाते उघडले जाते. नंतर सदर नियोजित निधी त्या खात्यामध्ये जमे केले जाते. यानंतर समिती प्रस्ताव आमंत्रित करते व त्यानुसार खर्च केला जातो. गावातील स्वच्छता, पाणी पुरवठा व आरोग्याशी संबंधित इतर कामांना हातभार लावण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाकडे व त्यानंतर जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटीच्या माध्यमातून ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविली जाते. सदर योजनेच्या माध्यमातून ग्राम आरोग्य योजना व नुट्रीशन डे, आरोग्यविषयक ग्रामसभा, ग्राम आरोग्यासाठी खरेदी, कुपोषित बालकांसाठी पोषकतत्व योजना, गरोदर महिलांच्या प्रसुतीसाठी त्यांना प्रवासाची सोय, कुत्रा किंवा सर्पदंश झाल्यास त्यांचा रूग्णालयापर्यंतचा प्रवास व औषधोपचार व गावागावात आरोग्यविषयक जणजागृतीसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. याशिवाय गावात होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे शुद्धीकरण, शासकीय नळ तुटल्यास त्याची सुधारणा, अंगणवाडीचे रंगरोगन, दुरूस्ती व फर्नीचर खरेदी तसेच अंगणवाडीतील बालकांच्या खेळण्यांसाठी खर्च केला जातो.या योजनेतून ० ते ५०० लोकसंख्या असलेल्या गावास पाच हजार रूपये, ५०१ ते १५०० लोकसंख्या असलेल्या गावास आठ हजार रूपये, १५०१ ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावास १५ हजार रूपये, १० हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावास २४ हजार रूपये व १० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावास ३० हजार रूपये दिले जातात. (प्रतिनिधी)