शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले ७३ सिमेंट नालाबांध

By admin | Updated: April 27, 2015 00:33 IST

प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियान : शासनाच्या विशेष निधीतून होणार बांधकामगोंदिया : प्रत्येक गावाच्या शिवारात पाणी या उद्देशातून राज्य शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्याला ७३ सिमेंट नालाबांध देण्यात आले आहेत. यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी देण्यात आला असून त्यातून येत्या जून महिन्यापर्यंत नालाबांध तयार करण्यात येणार आहे. राज्यात दर २ वर्षानंतर काही भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता राज्य शासनाने ‘सर्वांसाठी पाणी-टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्यात ९४ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांना जलयुक्त शिवाराच्या मुख्य संकल्पनेत रूजविण्यासाठी १०० कोटींचा अपेक्षीत खर्च आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गाव शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करून पाणी पुरवठ्यात वाढ करणे. भूजल अधिनियमाची अंंमलबजावणी. विकेंद्रीत पाणी साठे तयार करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, हे या अभियानाचे उद्देश आहे. यांतर्गत राज्य शासनाकडून राज्यात सहा हजार सिमेंट नालाबांध तयार करण्यात येणार आहे. यातील ७३ सिमेंट नालाबांध जिल्ह्याला देण्यात आले आहेत. हे सिमेंट नालाबांध तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून ९.४० कोटींचा विशेष निधी देण्यात आला आहे. याकरिता आवश्यक निविदा प्रक्रीया पूर्ण करण्यात आली असून येत्या जून महिन्यापर्यंत हे सिमेंट नालाबांध तयार करण्यात येतील. (शहर प्रतिनिधी)कृषी व जलसंधारण विभागाकडे जबाबदारी जिल्ह्यात ७३ सिमेंट नालाबांध तयार करण्याची जबाबदारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व लघुसिंचन (जलसंधारण) विभागाकडे देण्यात आली आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने निवड करण्यात आलेल्या गावांतून कोठे या नालाबांधची गरज आहे व संबंधीत संपूर्ण आराखडा तयार करून दिला आहे. यात २३ नालाबांधची जबाबदारी जलसंधारण विभागाकडे देण्यात आली असून यासाठी ३७४.८२ लक्ष रूपये तर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे ५० नालाबांधचे काम देण्यात आले असून यासाठी ५३७.९० लक्ष रूपयांचा निधी अपेक्षीत आहे. अशाप्रकारे ९१२.७२ लक्ष रूपयांच्या या ७३ बांधकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाकडून ९.४० कोटी रूपयांच्या विशेष निधीची तरतूदही करण्यात आली आहे. सर्वाधिक नालाबांध गोंदिया तालुक्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला देण्यात आलेल्या ७३ सिमेंट नालाबांधसाठी संबंधित विभागाकडून गावांची निवड करण्यात आली आहे. विभागाने निवड केलेल्या गावांच्या यादीत सर्वाधिक गावे गोंदिया तालुक्यातील दिसून येत आहेत. यादीनुसार, गोंदिया तालुक्यातील सर्वाधिक १७ गावे असून त्यानंतर गोरेगाव तालुक्यातील २, तिरोडा तालुक्यातील १९, देवरी तालुक्यातील १०, सडक अर्जुनी तालुक्यातील ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २, सालेकसा तालुक्यातील १५ तर आमगाव तालुक्यातील ३ गावांचा समावेश आहे.