शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१.९० लाख हेक्टरवर भातपीक

By admin | Updated: April 28, 2016 01:29 IST

गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसाचा फटका सहन करीत असलेल्या गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नवीन खरीप हंगामात चांगला पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कृषी विभागाचे नियोजन: नवीन हंगामात उत्पादन वाढीची अपेक्षागोंदिया : गेल्या दोन वर्षांपासून कमी पावसाचा फटका सहन करीत असलेल्या गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या नवीन खरीप हंगामात चांगला पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नव्या आशेने शेतकरी वर्गाला खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. त्यासाठी कृषी विभागाकडूनही जोरात तयारी सुरू आहे.जिल्ह्यात मुख्य पिक असणाऱ्या भातपिकाचे खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८४ हजार ९०० हेक्टर आहे. यावर्षी हे क्षेत्र १ लाख ९० हजार राहील असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यातून सरासरी २२०० किलो प्रतिहेक्टर एवढे उत्पन्न अपेक्षित असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.२०१४-१५ आणि २०१५-१६ या हंगामातील खरीप हंगामावर एक नजर टाकल्यास २०१५-१६ मध्ये उत्पन्नात बरीच घट आल्याचे दिसून येते. सरासरी हेक्टरी १५८२ किलो प्रतिहेक्टर एवढा उतारा यावर्षी आला. गेल्यावर्षी २०१४-१५ मध्ये हा उतारा २००२ किलो प्रतिहेक्टर एवढा होता. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे उत्पन्नात घट झाली. मात्र नवीन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे गणित योग्यरित्या साधले आणि पावसाचे प्रमाण योग्य प्रकारे झाले तर पुढील वर्षी चांगले उत्पन्न होऊन गेल्यावर्षीच्या उत्पन्नातील घट भरून निघू शकते, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. नवीन खरीप हंगामात ४ लाख १८ हजार मे.टन एवढे धानाचे उत्पन्न होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.भातपिकासोबत २०१६-१७ च्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र ७४०० हेक्टर, तीळ १२०० हेक्टर, मका १०० हेक्टर, मूग १०० हेक्टर, उडीद १०० हेक्टर आणि इतर कडधान्य १०० हेक्टरवर राहणार आहे. याशिवाय काही क्षेत्रात ऊस आणि भाजीपाल्याचे नियोजन करण्यात आले आहे. जमिनीचा पोत, बियाणे, फवारणी यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल, असे उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)- तर गेल्यावर्षी भरपूर उत्पन्न झाले असते२०१५-१६ च्या खरीप हंगामात पिकांची स्थिती चांगली होती. सर्वसाधारण पर्जन्यमानानुसार जूनमध्ये २००.५ मिमी पाऊस पडतो तो गेल्यावर्षी २२१.५ मिमी पडला. जुलैमध्ये ४८८.३ मिमी ऐवजी २७५.५ मिमी पडला, आॅगस्टमध्ये ४३६.०२ मिमीऐवजी ३४६.८ मिमी पडला. सप्टेंबरमध्ये २२४.५ मिमीऐवजी २२४.९ मिमी पडला. मात्र आॅक्टोबरमध्ये धानपिकात दाणे भरण्याचा काळ असताना त्यावेळी ६२.९६ मिमी पाऊस पडण्याऐवजी अवघा २.२ मिमी पाऊस पडला. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला आणि अपेक्षित उत्पन्न एकदम घटले. केवळ आॅक्टोबर महिन्यात पावसाची मात्र योग्य प्रमाणात झाली असती तर गेल्यावर्षी भरपूर उत्पन्न झाले असते, असे कृषी विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी सांगितले.