शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहूसाठी १० हजार प्रतिहेक्टरी कर्ज

By admin | Updated: May 11, 2014 00:27 IST

खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते.

रावणवाडी : खरीप व रबीच्या हंगामासाठी बँकांद्वारे कर्जाची मदत महत्त्वाची भूमिका बजावते. अल्पदराने मिळणार्‍या कर्जातून आत्महत्येकडे वळणार्‍या शेतकर्‍याला अभय मिळते. परंतु सध्याच्या धोरणात बँकांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्ज देण्याऐवजी ओलिताच्या शेतीला १३ हजार तर कोरडवाहू प्रतिहेक्टरी १० हजार रूपये कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने नवीनच संकट शेतकर्‍यांवर ओढवले आहे. सन २०१३ ते १४ या वर्षात नवीन धोरणाचा उपयोग करण्यात येत असल्याने शेतकरी आल्यापावली बँकेच्या दारातून परतला आहे. पूर्वीचे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसामुळे धानाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. मृगाचा हंगाम केवळ महिनाभर येऊन ठेपला आहे. बँकांची मदत घेऊन नव्या दमाने धान उत्पादन करू, असा आशावाद त्यांना होता. परंतु या धोरणाने त्यांच्या आशेवरच पूर्णत: पाणी फेरले. परिसरात काही शेतकर्‍यांनी जमीन कसण्याची उगीचच कटकट म्हणून जमिनी कवडीमोल भावात विकण्याचा सपाटा सुरू केला. काही दलालांच्या टोळ्या गावागावांत शेतकर्‍यांच्या दारात पोहचत असल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांचा कल हक्काचा व नगदी रोजगाराकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे बँकेने सरसकट कर्ज देवून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. बँकेचे कर्ज, सावकाराची मदत आणि सरकारचे धोरण शेतकर्‍यांपर्यंत वेळेवर पोहचले नसल्याने मागील वर्षी जिल्ह्यातील एकूण पेरणीयुक्त जमिनीपैकी २४ हजार २९० हेक्टर जमीन पडीत राहिली. शेतकर्‍यांनी शेती करण्यासाठी कायमचा रामराम ठोकला. काहींनी शहरात धाव घेऊन मिळेल तो व्यवसाय स्वीकारला. भूमाफियांना मात्र या संधीचे सोने केले. (वार्ताहर)