शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

विरोधकांमधील काहीजण सैरभैर पण सरकार स्थिर: प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 7:40 PM

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी  सरकारला पाठींबा देऊन आपण चूक केली की काय अशा प्रकारचा प्रश्न पडत असल्याचे विधान केलं होत.

पणजी: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी  सरकारला पाठींबा देऊन आपण चूक केली की काय अशा प्रकारचा प्रश्न पडत असल्याचे विधान केलं होत. यावर विरोधकांमधील काहीजण सैरभैर झाली आहेत पण सरकार स्थिर असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.

प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याच्या जनतेला सरकारचे आवडू लागले आहे. काहीजणांना ते पाहवत नाही. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत व काहीही विधाने करतात. काहीजणांना सरकारचे काम ब:यापैकी चाललेय हे पाहवत नाही. जे काहीही विधाने करतात, त्या विधानांची आम्ही काळजी करत नाही. आमच्याकडे सत्तावीस आमदारांचे संख्याबळ आहे. शिवाय तिघेजण सरकारला पाठींबा देतात.तसेच मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित असलेले मंत्री गुदिन्हो म्हणाले, की सरकारची प्रगती पाहून काहीजण डिस्टर्ब झालेले आहेत. कोण डिस्टर्ब झालेत, त्यांची नावे मी घेत नाही, कारण लोकांना ते ठाऊक आहे. काहीही विधाने विरोधक करतीलच. ती विधाने राजकीय स्वरुपाची आहेत. विरोधक जे काही बोलतात, ते ऐकले की, सरकार योग्य प्रकारे काम करतेय हे स्पष्ट होतं असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, विजय सरदेसाई यांनी प्रथम पर्रिकर यांच्या सरकारला व त्यानंतर सावंत यांच्या सरकारला पाठिंबा देऊन आपण चूक तर केली नाही ना असा प्रश्न सतत पडत असल्याचे विधान केले होते. तसेच विश्वासघाताचे जे काही बीज आहे, ते या दोन प्रश्नांमध्ये आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्लीहून मिळतील, नव्या वर्षी तरी निश्चितच मिळतील असेही सरदेसाई म्हणाले. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की सरदेसाई काय बोलले त्यावर मला काही भाष्य करायचे नाही. मात्र मी एवढे निश्चित सांगतो की, आमचे सरकार चांगले काम करत आहे. आमचे सरकार स्थिर आहे व विधानसभेचा उर्वरित कार्यकाळही पूर्ण करण्याचा विश्वास असल्याचा प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाBJPभाजपा